एक्स्प्लोर

Refinery Project: रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध; आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस अधिक कुमक मागवणार?

Refinery Project: शनिवारी स्थानिकांच्या विरोधानंतर रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण रोखण्यात आले होते. त्यानंतर आज सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी पोलीस अधिक कुमक मागवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आंदोलकही मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे.

Refinery Project: रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. शनिवारी, स्थानिक रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षण रोखल्यानंतर आज पुन्हा सर्वेक्षण होणार आहे. आंदोलकांच्या तीव्र विरोधामुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या सर्वेक्षणासाठी पोलीस अधिक कुमक मागवण्याची शक्यता आहे. तर, दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण न करू देण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या रिफायनरीसाठी जमिनीचे, मातीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी, रिफायनरीविरोधक आंदोलकांनी ड्रोन सर्व्हे, माती परीक्षणाला विरोध केला होता. यावेळी पोलिसांसोबत मोठी बाचाबाचीदेखील झाली. स्थानिकांचा विरोध पाहता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले नाही. त्यानंतर आज पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रत्नागिरीहून जास्तीची कुमक मागितली आहे. तर, रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलक मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. रिफायनरिला स्थानीक जनतेचा प्रखर विरोध असताना कोणत्या आधारावर ही रिफायनरी आणली जातेय? सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी, असा प्रश्नदेखील स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी आली आहे. त्यानंतर रिफायनरी समर्थक सक्रिय झाले असून त्यांनी सामंत यांची भेट घेतली. रिफायनरी प्रकल्प पूर्ण करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नाणार इथला रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला होता. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव इथल्या जागेबाबत पत्र लिहिलं. त्यानंतर कोकणातल्या रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. पण शिवसेनेने मात्र लोकांचं म्हणणं महत्त्वाचं असेल अशी काहीशी भूमिका घेतली. परंतु आता त्याच शिवसेनेमधील पण शिंदे गटातील आमदार असलेले उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री आहेत. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकार रिफायनरीबाबत काय भूमिका घेणार? कोकणातीलच असलेले नवीन उद्योग मंत्री रिफायनरीचा प्रश्न कसा हाताळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

सध्या रिफायनरीचं भवितव्य काय? 

'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सौदी अरेबियाची आरमको कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात बोलणी सुरु आहे. प्रकल्पाला विलंब होत आहे. त्यामुळे कंपनी नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. पण, आता रिफायनरी उभी राहिल्यास ती 20 मिलियन मेट्रिक टन प्रति वर्षी इतक्या क्षमतेचा असणार आहे. सध्या बारसू-सोलगावमधील रिफायनरीला विरोध असून त्याविरोधात स्थानिकांनी मोठं आंदोलन देखील उभारलं आहे. माती परीक्षण आणि ड्रोन सर्व्हे देखील स्थानिकांनी रोखला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. बारसू-सोलगावमध्ये रिफायनरी झाल्यास आम्ही त्याला विरोध करु, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. त्याचवेळी रिफायनरी व्हावी यासाठी देखील आता समर्थक पुढे येत आहेत. अर्थात सध्या सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या हाती कोकणातील रिफायनरीचं भवितव्य असणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget