एक्स्प्लोर

कर्जमाफीच्या धोरणात बदल करा, नाहीतर वेगळ्या भाषेत सांगू, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

कर्जमाफी घोषित झाल्यानंतर देखील शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

कोल्हापूर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुन्हा कडाडून विरोध केला आहे. सरकारला कर्जमाफीच्या धोरणात बदल करावा लागेल. नाहीतर रोषाला सामोरं जावं लागेल, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. सरकारने व्यापक चर्चा करून कर्जमाफी जाहीर केली असती तर बर झालं असतं. सरकार जर ऐकणार नसेल तर सरकारला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. कर्जमाफी घोषित झाल्यानंतर देखील शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 2019 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा वास्तविक पाहता बरोबर नाही. कारण राज्यात दुष्काळ त्यानंतर नापिकी, महापूर, ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीककर्जाची मुदत 30 जून 2020 आहे. त्यामुळं थकबाकी जाण्याचा विषयच नव्हता, असं देखील शेट्टी म्हणाले होते. हेही वाचा - 39 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा फायदा, सरकारवर जवळपास 30 हजार कोटींचा ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्या पिकांना ना कर्जमाफी मिळाली ना फायदा मिळाला. त्यामुळं त्यांचं नुकसान झालं, बर्बाद झाले ते वंचित राहिले. नेमकी ही कर्जमाफी कुणाला मिळणार हा प्रश्न आहे, असं देखील शेट्टी यांनी सांगितलं होतं. या कर्जमाफीबाबत आकडेवारी तपासावी लागेल. यात किती लाभधारक बसतात. पण नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जर असेल तर ते शेतकरी या योजनेत बसणारच नाहीत, अशी माहिती देखील शेट्टींनी दिली होती. हेही वाचा- Explainer | शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचा साधा फंडा | ABP Majha  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटींची गरज नसल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र, ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीसाठाही काही अटीशर्ती असल्याची माहिती हाती लागली आहे. कर्जमाफीसाठी या असतील अटी - शेतकरी कर्जमाफी करताना आधार कार्डचा 'आधार'; आधारकार्डला जोडलेल्या खात्यात कर्जमाफीचे थेट पैसे येणार. - शेतकर्‍यांना कोणतीही अट नाही - मंत्री, आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी यांना कर्जमाफी मिळणार नाही - मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना लाभ मिळणार - कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना अर्ज करण्याची गरज नाही - बँकांकडून शेतकर्‍यांच्या खात्यांची माहिती घेणार - भाजप सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा मोठी कर्जमाफी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. मार्च 2020 पासून योजनेची अंमलबजावणी होणार आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन  ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांनासुध्दा प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत सरकार योजना जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. राज्याची वित्तीय स्थिती चांगली असो अथवा नाजूक असो, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही योग्य ते निर्णय घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. संबंधित बातम्या  मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी कोणाकोणाला मिळणार  शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा  तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, कर्जमाफीवरुन फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल   शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
Parbhani Muncipal Corporation Election: परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

व्हिडीओ

Thane Shiv Sena : ठाण्यात युती अडचणीत, शिवसेना स्वतंत्र प्रचाराचा नाराळ फोडणार
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?
Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
Parbhani Muncipal Corporation Election: परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
Parbhani : ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; कांग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; कांग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Rajyog On 2026 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच करिअरची गाडी सुस्साट वेगाने धावणार, मालव्यसह जुळून येतायत 'हे' 3 राजयोग; नशिबाची चांदीच चांदी
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच करिअरची गाडी सुस्साट वेगाने धावणार, मालव्यसह जुळून येतायत 'हे' 3 राजयोग; नशिबाची चांदीच चांदी
Embed widget