![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे ठाकरे सरकार पूजा चव्हाणला न्याय देणार का? : चंद्रकांत पाटील
Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देणार का, असा प्रश्न भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
![छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे ठाकरे सरकार पूजा चव्हाणला न्याय देणार का? : चंद्रकांत पाटील Will cm Uddhav Thackeray give justice in Pooja Chavan suicide case says Chandrakant Patil छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे ठाकरे सरकार पूजा चव्हाणला न्याय देणार का? : चंद्रकांत पाटील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/13213214/chandrakant-patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असा प्रश्न विचारला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देणार का? अशा प्रश्नांवर नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलीस का चौकशी करत नाही? मुलीचे आई वडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे. या सरकारची प्रतिमा डागळत चालली आहे, काही करा काही होत नाही, असे या सरकारच्या काळात झाले आहे, असा घणाघात पाटील यांनी केला.Sanjay Rathod : मंत्री संजय राठोड नॉट रिचेबल, राठोड नेमके गेले कुठे?
शरद पवार यांनी यात लक्ष घालावे : पाटील एक मंत्री 15 वर्ष एका महिलेसोबत राहतो. महिलेची तक्रार असूनही कारवाई होत नाही तर दुसरा मंत्री कार्यालयात बोलवून मारहाण करतो. या सरकारमध्ये चाललय काय? पूजा चव्हाणच्या निमित्ताने हे सर्व प्रश्न ऐरणीवर आले आहेत. पूर्ण महाराष्ट असुरक्षित झाला आहे. सत्तेसाठी काहीही करणार असे झाले आहे. ज्यांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालते त्या पवारांनी यात लक्ष घालावे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पॉवरचा उपयोग करून चौकशी केली पाहिजे. त्यात मंत्री गुंतल्याचे बोलले जाते, त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्या मुलीच्या पाळतीवर ठेवलेल्या 2 जणांना अटक का झाली नाही? त्यांना का सोडून दिले. मुलीचा लॅपटॉप जप्त केला पाहिजे. त्याची तपासणी केली पाहिजे. पोलिस गेल्या काही महिन्यात दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या 14 पंधरा महिन्यात अनेकांनी धमक्या दिल्या आम्ही म्हणतो काढा सिड्या कोण आहे दोषी ते कळू द्या आम्ही घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या सीडी काढतो वक्तव्यावर पाटील यांनी दिली.
डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू, शवविच्छेदन अहवाल पोलिसांना सुपूर्द
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)