एक्स्प्लोर

Aditya Thackeray : तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा; आदित्य ठाकरेंची थेट शेतीच्या बांधावरुन मागणी

तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

Aditya Thackeray :  तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी आज नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, "संकट कितीही मोठं असलं तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून उभी आहे. सरकारमध्ये नसल्याने तुम्हाला देण्यासाठी आमच्या हाती काही नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी कर्जमुक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली होती. मात्र आताही तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तातडीची नुकसान भरपाई दिली पाहिजे, शेतीचे पंचनामे लगेच झाले पाहिजेत. नेते आणि मंत्र्यांनी नुकसानग्रस्त परिसरात दौरे करायला हवेत आणि  शेतकऱ्यांना आपल्यासाठी राबणाऱ्या बळीराज्याला आपलं सरकार आहे, असं वाटलं पाहिजे."

आत्महत्येचं पाऊल उचलू नका
नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करताना आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना खंबीर सोबत असल्याचा विश्वास दिला. जीवाचं काही बरं वाईट करुन घेऊ नका, आत्महत्येचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करुन आपल्याला काहीही मिळणार नाही. आपल्याला आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना कायम तुमच्या सोबत आहेत,त्यामुळे आत्महत्या करु नका, अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली. 

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी लढा देऊ: आदित्य ठाकरे
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन घ्यायचा असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. शेतकरी, देशाचा नागरिक म्हणून आपल्याला आपला आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना धीर द्यायला जातोय: अदित्य ठाकरे
राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारं आमचं सरकार होतं. आता विरोधी पक्षात असलो तरी आमची जबाबदारी म्हणून आम्ही जात आहोत, असं त्यांनी दौऱ्यासाठी रवाना होताना माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
Rohit Pawar : पार्थ पवार, सुनेत्राकाकींशी 'त्या' विषयावर चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 
पार्थ पवार, सुनेत्राकाकींशी 'त्या' विषयावर चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 
NEET Exam Paper Leak: रसायनशास्त्राचा प्राध्यापक ते NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड, सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची संपूर्ण कुंडली!
रसायनशास्त्राचा प्राध्यापक ते NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड, सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची संपूर्ण कुंडली!
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget