Manoj Jarange Patil : पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंना भोवळ, उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल
Manoj Jarange Patil , Pune : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅले आज पुण्यात पोहोचले आहेत. पुण्यात त्यांनी शांतता रॅलेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर आरोपही केले.
![Manoj Jarange Patil : पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंना भोवळ, उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल Manoj Jarange Patil After the peace rally in Pune Manoj Jarange was admitted to Sahyadri Hospital in for treatment Marathi News Manoj Jarange Patil : पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंना भोवळ, उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/11/ea88b9aaaa787eb5970da61dd065a4861723398071522924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Manoj Jarange Patil , Pune : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅले आज पुण्यात पोहोचले आहेत. पुण्यात त्यांनी शांतता रॅलेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर आरोपही केले. मात्र, शांतता रॅलीला संबोधित केल्यानंतर मनोज जरांगे यांना भोवळ आली आहे, त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
पुण्यातील शांतता रॅलीत मनोज जरांगे काय काय म्हणाले?
शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो, आमच्या मागण्या पूर्ण करा. मी लढायला तयार आहे. मला चारही बाजूने घेरले आहे आता फक्त उघडे पडू नका फक्त एकजूट राहा. फडणवीस, भुजबळ यांना दंगली घडवायची आहे. मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नका आणि त्यांनी पण मराठ्यांच्या अंगावर जाऊ देऊ नका. राज्य शांत ठेवा. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही.
मुंबईला चक्कर हाणायची का? काही काही जणांना मस्ती आली आहे
फडणवीस यांनी जेवढं रक्त आमच्या आई बहिनींचे सांडायचे तेवढे सांडले. आता फक्त सगे सोयरेचे अंबलजावणी राहिली आहे. सगे सोयरे आरक्षणासाठी सरकार पाडायचे. 75वर्ष आम्ही तुम्हाला दिले, 5 वर्ष आमच्यासोबत राहा. काहीही करा एकजूट तुम्ही दाखवा. मुंबईला चक्कर हाणायची का? काही काही जणांना मस्ती आली आहे. आपल्या मराठामध्ये माझ्या सकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभ करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं. एक जण उभं करायचं आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचे.
मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं आहे. 3 महिने काम करा, 5 वर्ष मराठ्यांचे कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थ क्षेत्राला जायचं नाही. बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय शेताकडे जायचं नाही. गिरीश महाजन तुमच्या मतदारसंघात 1 लाख 36 हजार मतदार मराठा आहेत, येवल्या मध्ये सुद्धा 1 लाख 16 हजार मतदार मराठा आहेत. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा मधले सगळे सीट पडणार आहेत. मुंबईत निवडून आणणं जरा जड आहे पण तिथे गेलेले महाराष्ट्रातील मराठा आहेत. पक्षाला आणि नेत्याला बाप मानने बंद करा, मरेपर्यंत तुमच्याशी गद्दरी करणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरकार ने हा कायदा पारिद केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Jaykumar Gore : मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप, भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)