![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ambadas danve on Nikhil Wagle Attack : फडतूसपणा बंद करा! पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
निखिल अंबादास दानवेंनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. एक्सवर त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत फडतूसपणा बंद करा, पुण्याच्या रस्त्यावरच दहशतीचे दर्शन होत असल्याचं ते म्हणाले आहेत.
![Ambadas danve on Nikhil Wagle Attack : फडतूसपणा बंद करा! पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल Ambadas danve on Nikhil Wagle Attack ambadas danve criticise Pm Modi and Bjp Government Ambadas danve on Nikhil Wagle Attack : फडतूसपणा बंद करा! पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/10/dc01650ca28a7a4693fc6c352d9c5ecc1707566662742442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाला जात असताना भाजपकडून पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाईफेकदेखील करण्यात आली. यावेळी काही शरद पवार गटाच्या महिलांना भाजपकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणावरुन आता विरोधीपक्षाकडून टीका केली जात आहे. हा सगळा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचं विरोधक म्हणत आहे. यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas danve) सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. एक्सवर त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. फडतूसपणा बंद करा, पुण्याच्या रस्त्यावरच दहशतीचे दर्शन होत असल्याचं ते म्हणाले आहेत.
अंबादास दानवेंनी ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
अंबादास दानवे यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोंदींवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, पंतप्रधान मोदी महिला सबळ करण्याच्या गप्पा करतात आणि त्यांचे भक्त हे महिलांना मारहाण करतात. गुंड केवळ मंत्रालयात नाहीत तर आता पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन घडवू लागले आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम झाले असेल, पण किती कार्यकर्त्यांना अटक झाली? हे सांगा.. फडतूसपणा बंद करा.. पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करीत असताना त्यांच्या संरक्षणासाठी सरसावलेल्या भक्ती कुंभार आणि इतर भगिनींना देखील भाजपाच्या गुंडांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ आहे.
शरद पवार गटातील महिलांनी कोणते आरोप केले?
अंबादास दानवे यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात वागळेंवर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेली महिला दिसत आहे. या महिलेच्या अंगावर शाई उडलेली दिसत आहे. 'भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या घरात महिला नाही आहेत. त्यांनी त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतलेला नाही आहे. या कार्यकर्त्यांनी विरोधक असलेल्या महिलांच्या अंगावर शाईफेक केली, दगडफेक केली. त्यासोबत पुरुषांनी काही महिलांचे कपडेदेखील फाडले. ही पुण्याची संस्कृती आहे का?छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची तुम्ही भाषणं करता. ती भाषणं फक्त देऊ नका तर ते भाषणं तुम्हीदेखील ऐका. देश नेमका कोणत्या मार्गाने पुढे जात आहे. जरा माणुसकीच्या नात्याने लोकांबरोबर वागा. पोलीस प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहिती असूनही कोणी मदतीला पुढे आलं नाही. पोलिसांवरही गुन्हे दाखल व्हावे, अशी कळकळीची विनंती पोलीस अधिकाऱ्यांना करते. महिलांनी कुटुंबियांना नेमकी काय उत्तरं द्यायची. महिलांनी राजकारणात उतरायचं की नाही, असे अनेक आरोप शरद पवार गटातील महिला कार्यकर्त्यांनी केले आहेत.
पंतप्रधान मोदी महिला सबल करण्याच्या गप्पा करतात. आणि त्यांचे भक्त हे महिलांना मारहाण करतात. गुंड केवळ मंत्रालयात नाहीत तर आता पुण्याच्या रस्त्यावरही दहशतीचे दर्शन घडवू लागले आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम झाले असेल, पण किती कार्यकर्त्यांना अटक झाली? हे सांगा.. फडतूसपणा बंद करा..… pic.twitter.com/NgcLGrAXDy
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 10, 2024
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)