![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
हनुमान वाट बघत असेल म्हणून मी देवळात गेलो: संजय राऊत
Sanjay Raut: सध्या राज्यात आणि देशात हनुमान यांच्यावरून राजकारण चांगलाच तापलं आहे.
Sanjay Raut: सध्या राज्यात आणि देशात हनुमान यांच्यावरून राजकारण चांगलाच तापलं आहे. अशातच नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, ''मला कोणी बोलावले तर मी येतो. आज मला देवळात घेऊन गेले, हनुमान वाट बघत असेल म्हणून मी गेलो.'' नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित, यावेळी ते असं म्हणाले आहेत.
काय म्हणाले संजय राऊत?
या कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले आहेत की, मला कोणी बोलावले तर मी येतो. आजपर्यंत डॉक्टर बोलवत नव्हते. मला जर कोणी प्रेमाने बोलावलं तर मी नक्की येतो. आज मला हे लोक देवळात घेऊन गेले. मी गेलो. आज हनुमान जयंती आहे, देवळात जायला हवं, असं हे (कार्यकर्ते) लोक म्हणत होते. मी म्हटलं चला, हनुमान वाट बघत असले तर आपण जाऊ. शेवटी प्रत्येकाची श्रद्धा आहे, असं ते म्हणाले. डॉक्टरांवर बोलताना राऊत म्हणाले, फॅमिली डॉक्टर पिढ्यान पिढ्या असतात. डॉक्टराची ही घराणेशाही असते.
डॉक्टरांवर श्रद्धा असायला हवी
राऊत म्हणाले, आपण ज्या डॉक्टरांकडे जातो त्यावर आपली श्रद्धा हवी. जो आपल्यावर उपचार करतो. पिढ्यान पिढ्या फॅमिली डॉक्टर असतात. डॉक्टराचीही घराणेशाही असते आणि ही घराणेशाही असलीच पाहिजे.
उद्धव ठाकरे यांचा वैद्यकीय क्षेत्रात चांगला अभ्यास
राऊत म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वैद्यकीय क्षेत्रात चांगला अभ्यास आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अभ्यासामुळे आपण कोरोना काळात सामोर गेलो, धारवीमध्ये कोरोना वाढेल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. यासोबतच दिल्लीतील आरोग्य सेवेबद्दल ते म्हणाले आहेत की, दिल्लीची आरोग्य व्यवस्था चांगली आहे. मोहल्ला क्लिनिकचा अभ्यास करायला लोक येतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)