एक्स्प्लोर

Nitish Kumar Meets Rahul Gandhi: नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली, या मुद्द्यांवर झाली चर्चा

Nitish Kumar Meets Rahul Gandhi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पन्नास मिनिटे चर्चा झाली.

Nitish Kumar Meets Rahul Gandhi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पन्नास मिनिटे चर्चा झाली. बिहारमध्ये काँग्रेस समर्थित महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची ही पहिलीच भेट होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश यांनी माध्यमांशी संवाद टाळला.

बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांचे फोनवरून अभिनंदन केले होते. या दोन्ही नेत्यांची भेट वेळी झाली आहे, जेव्हा रविवारीच राहुल गांधींनी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नितीश कुमारही विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन करत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. दिल्ली दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढा द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे.

दिल्लीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राबडी देवी तेथे उपस्थित होत्या. नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, 'आज मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे. ते आमच्या महाआघाडीचे भागीदार असलेल्या अनेक नेत्यांना भेटतील. देशाच्या विरोधकांना एकजूट दाखवावी लागेल, असे नितीश कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.'

दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा साधला आहे. चिराग पासवान यांनी नाव न घेता ट्वीट करत म्हटलं आहे की, "ऐकले आहे की, जाब विचारल्यावर लाठ्यांचा वर्षाव करणारा मुख्यमंत्री 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे. बिहारमध्ये विकास करण्याऐवजी ते विरोधी पक्षांना एकत्रित करण्यात गुंतले आहेत. याचदरम्यान नितीश कुमार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे जेडीयूच्या बाजूने आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. जेडीयू नेते उपेंद्र कुशवाह यांनीही एबीपी न्यूजशी बोलताना मुख्यमंत्री नितीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bangladesh PM Delhi Visit: शेख हसीना चार दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात पोहोचल्या, एस जयशंकर यांची घेतली भेट
Car Seat Belt: कारच्या मागच्या सीटवर बसतानाही सीटबेल्ट लावणार, आनंद महिंद्रा यांनी केला संकल्प

महत्त्वाच्या बातम्या

बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget