एक्स्प्लोर

Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली असून भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे.

पाटणा : देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या (Bihar vidhansabha) निवडणुकांच्या 243 जागांसाठी अखेर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झालं. सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिहारच्या दुसऱ्या टप्प्यात आज 67 टक्के एवढं मतदान झाल्याची माहिती आहे. 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 65 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे बिहारची जनता यंदा मतदानासाठी बाहेर पडल्याचं दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपताच एक्झिट पोल समोर आले असून बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या नेतृत्वातच सरकार बनणार असल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असून नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षालाही मोठं यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीसाठी 14 नोव्हेंबर रोजी खरा निकाल जाहीर होईल.

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली असून भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. बिहारमधील 243 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलमधून बिहारमध्ये कोणाचं सरकार बनणार, बिहारची जनता कोणाला कौल देणार, बिहार निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला किती जागा जिंकता येणार, या सर्वांचा अंदाजे कौल समोर आला आहे. त्यानुसार, बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जदयू एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत आहे.

नितीश कुमार यांच्या 20 ते 25 जागा वाढणार

बिहार विधानसभा निवडणुकीत गत 2020 मध्ये नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाने केवळ 43 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 74 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा 2025 च्या निवडणुकीत Matrize-IANS एक्झिट पोलनुसार जदयूला 65 ते 75 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. म्हणजेच गत निवडणुकीपेक्षा 20 ते 30 जागा अधिक जिंकण्याचा अंदाज आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 52 ते 57 जागा मिळू शकतात. म्हणजेच, गत निवडणुकीपेक्षा 10 ते 15 जागा अधिक आहेत. त्यामुळे, नितीश कुमारांचे पारडे जड असल्याचं पाहायला मिळत आहे. Matrize-IANS एक्झिट पोलनुसार भाजपला 65 ते 73 जागांवर विजय मिळू शकतो. तर, चाणक्यच्या आकडेवारीनुसार भाजपला 70 से 75 जागा जिंकता येतील, असा अंदाज आहे. दरम्यान, गत 2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांचीच हवा असल्याचं दिसून येत आहे. 

प्रशांत किशोर यांचा सुपडा साफ

बिहार निवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून एनडीए आघाडीला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. तर, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला बिहारच्या जनतेनं नाकारल्याचं स्पष्ट होत आहे. बिहार निवडणुकीसाठी MATRIZE-IANS च्या एक्झिट पोलनुसार, NDA ला 48 टक्के, महाआघाडीला 37 टक्के आणि इतरांना 15 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.

बिहार निवडणूक विविध संस्थांचे एक्झिट पोल सर्वेक्षण

आयएएनएस-मॅटराइजच्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 147-167 जागांवर विजय मिळू शकतो, तर राजद-काँग्रेस महाआघाडी केवळ 70-90 जागांवर यश मिळेल असा अंदाज आहे.

CHANAKAYA STRATEGIES च्या अनुसार एनडीए आघाडीला 130-138 जागा जिंकता येतील, तर काँग्रेस महाआघाडीला 100-108 जागांवर विजय मिळेल. इतर पक्ष 3 ते 5 जागांवर यश मिळवतील. त्यामुळे, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला यश मिळणार नसल्याचं दिसून येत आहे.

POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 133-148 जागांवर विजय मिळेल, महाआघाडीा 87-102 जागा जिंकता येतील आणि इतर पक्षांना 3 ते 5 जागांवर समाधान मानाने लागेल.

Poll Dairy च्या एक्झिट पोलनुसार एनडीए एनडीए आघाडीला तब्बल 184 ते 209 जागांवर विजय मिळणार असा अंदाज आहे, तर काँग्रेस महाआघाडीला 32 ते 49 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. इतर मध्ये केवळ 1 ते 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे.

Praja Poll Analytics च्या सर्व्हेनुसार एनडीए आघाडीला 186 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे, तर महाआघाडीला 50 जागा जिंकता येतील असे दिसून येते. याशिवाय इतर पक्षांना 7 जागांवर समाधान मानावे लागेल.

TIF Research एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 145-163 जागा जिंकता येतील, तर महाआघाडीला 76 ते 95 जागांवर विजय मिळेल, असे दिसून येते. इतर पक्षांना फक्त 0 ते 1 जागा जिंकता येईल, असा सर्व्हेचा अंदाज आहे.

हेही वाचा

Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget