एक्स्प्लोर

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पुरामुळे 21 जणांचा मृत्यू; आठवडाभरात झालेल्या पावसात मोठी जीवितहानी

Palghar Rain: आठवडाभरात झालेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावपाड्यात पूर आला आणि यात एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने हाहा:कार माजवला. विशेषतः पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आला होता. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते, घर आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर जिल्ह्यातील विविध ठिकाणी 21 जणांचा पुरात (Flood) वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. 

मृतांची तालुकानिहाय संख्या

  • पालघर - 6 
  • डहाणू - 4 
  • वसई - 4 
  • तलासरी - 1
  • वाडा - 1
  • विक्रमगड - 1
  • जव्हार - 4

पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आज डहाणू (Dahanu) तालुक्यातील वाघाडी, वेती या परिसरात पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. महसूल विभागाअंतर्गत  मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले, तर नुकसानग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि आर्थिक सहाय्य करण्यात आलं आहे.

सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून चुकीचा विसर्ग करण्यात आल्याने सुर्या नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे शेती आणि घरांचं नुकसान झालं, तर काहीजण पुरात वाहून त्यांचा मृत्यूही झाला. दरवर्षी धरण 65 ते 70 टक्के भरल्यावर पाण्याचा विसर्ग करण्यात येतो, मात्र यावेळेस धरण 100 टक्के भरल्यानंतर अचानक 200 सेंटीमीटरने दरवाजे उघडून हा विसर्ग करण्यात आला. याला सर्वस्वी जबाबदार सुर्या प्रकल्प पाटबंधारे विभाग असल्याचा आरोप आमदार श्रीनिवास वनगा यांनी केला आहे, तर याबाबतीत अधिवेशनातही प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

पालघर जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टरवर भात शेती केली जाते तर, उर्वरित क्षेत्रावर बागायती शेती होते. पालघर जिल्ह्याबरोबरच जव्हार तालुक्यातील वडोली खरोंडा पिंपळशेत या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे काही वेळातच नद्यांना आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी थेट गावामध्ये शिरलं होतं. आताच रोपणी झालेल्या भात शेतीचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

शेती, घरांसह रस्त्यांचंही नुकसान

दुसरीकडे काही क्षणातच याच पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं, त्यामुळे घरातील माणसांनी कुटुंबासह आपला जीव वाचवण्यासाठी टेकड्यांवर पळ काढला. पुराच्या पाण्यामुळे घरातील सामानाबरोबरच जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाचे कागदपत्र आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचंही मोठ्या नुकसान झालं असून घरामध्ये चिखल पसरला होता. पुराच्या पावसामुळे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rain Update: राज्यातील पावसाचा जोर ओसरला; पण 'या' दिवसापासून पाऊस पुन्हा वाढणार

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget