एक्स्प्लोर

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पुरामुळे 21 जणांचा मृत्यू; आठवडाभरात झालेल्या पावसात मोठी जीवितहानी

Palghar Rain: आठवडाभरात झालेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावपाड्यात पूर आला आणि यात एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने हाहा:कार माजवला. विशेषतः पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आला होता. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते, घर आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर जिल्ह्यातील विविध ठिकाणी 21 जणांचा पुरात (Flood) वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. 

मृतांची तालुकानिहाय संख्या

  • पालघर - 6 
  • डहाणू - 4 
  • वसई - 4 
  • तलासरी - 1
  • वाडा - 1
  • विक्रमगड - 1
  • जव्हार - 4

पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आज डहाणू (Dahanu) तालुक्यातील वाघाडी, वेती या परिसरात पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. महसूल विभागाअंतर्गत  मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले, तर नुकसानग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि आर्थिक सहाय्य करण्यात आलं आहे.

सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून चुकीचा विसर्ग करण्यात आल्याने सुर्या नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे शेती आणि घरांचं नुकसान झालं, तर काहीजण पुरात वाहून त्यांचा मृत्यूही झाला. दरवर्षी धरण 65 ते 70 टक्के भरल्यावर पाण्याचा विसर्ग करण्यात येतो, मात्र यावेळेस धरण 100 टक्के भरल्यानंतर अचानक 200 सेंटीमीटरने दरवाजे उघडून हा विसर्ग करण्यात आला. याला सर्वस्वी जबाबदार सुर्या प्रकल्प पाटबंधारे विभाग असल्याचा आरोप आमदार श्रीनिवास वनगा यांनी केला आहे, तर याबाबतीत अधिवेशनातही प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

पालघर जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टरवर भात शेती केली जाते तर, उर्वरित क्षेत्रावर बागायती शेती होते. पालघर जिल्ह्याबरोबरच जव्हार तालुक्यातील वडोली खरोंडा पिंपळशेत या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे काही वेळातच नद्यांना आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी थेट गावामध्ये शिरलं होतं. आताच रोपणी झालेल्या भात शेतीचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

शेती, घरांसह रस्त्यांचंही नुकसान

दुसरीकडे काही क्षणातच याच पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं, त्यामुळे घरातील माणसांनी कुटुंबासह आपला जीव वाचवण्यासाठी टेकड्यांवर पळ काढला. पुराच्या पाण्यामुळे घरातील सामानाबरोबरच जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाचे कागदपत्र आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचंही मोठ्या नुकसान झालं असून घरामध्ये चिखल पसरला होता. पुराच्या पावसामुळे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rain Update: राज्यातील पावसाचा जोर ओसरला; पण 'या' दिवसापासून पाऊस पुन्हा वाढणार

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
Embed widget