एक्स्प्लोर

Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका

Maharashtra Flood Aid: ई-केवायसीसह तांत्रिक कारणास्तव लाभ न घेऊ शकलेल्या 5 लाख 42 हजार 141 शेतकऱ्यांचे 355 कोटी 55 लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

Maharashtra Flood Aid: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) राज्य शासनाने (Maharashtra Government) जाहीर केलेले 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज मोठ्या अपेक्षेने जाहीर झाले. निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र, या मदतयोजनेतील लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना गंभीर तांत्रिक अडथळे उभे राहिल्याचे समोर आले आहे. ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक व आधार माहितीतील तफावत, तसेच पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल 5 लाख 42 हजार 141 शेतकऱ्यांना घोषित मदत मिळालेली नाही. परिणामी या शेतकऱ्यांच्या नावावरची एकूण 355 कोटी 55 लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक बाब मुख्य सचिवांच्या आढाव्यातून उजेडात आली आहे.

Maharashtra Flood Aid: मराठवाड्यातील जिल्हानिहाय आकडेवारी

यापैकी सर्वाधिक भार मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 165 कोटी 72 लाख रुपये मदत अद्याप अडकल्याचे स्पष्ट झाले असून, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. बीड जिल्ह्यात 29 हजार 504 शेतकऱ्यांचे 15 कोटी 72 लाख रुपये प्रलंबित आहेत, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 45 हजार 482 शेतकऱ्यांचे 28 कोटी 51 लाख रुपये अद्याप वितरीत झालेले नाहीत. धाराशिवमध्ये 24 हजार 914 शेतकऱ्यांचे 17 कोटी 77 लाख, हिंगोलीत 13 हजार 151 शेतकऱ्यांचे 8 कोटी 26 लाख, जालना जिल्ह्यात 38 हजार 990 शेतकऱ्यांचे 2 कोटी 33 लाख, नांदेड जिल्ह्यात 55 हजार 811 शेतकऱ्यांचे तब्बल 31 कोटी 56 लाख आणि परभणीतील 45 हजार 775 शेतकऱ्यांचे 22 कोटी 57 लाख रुपये शासनाच्या तिजोरीत पडून आहेत.

Maharashtra Flood Aid: राज्यातील कुठल्या विभागात किती निधी शासनाच्या तिजोरीत पडून?

राज्यातील इतर विभागांतही मोठ्या प्रमाणात निधी प्रलंबित आहे. नाशिक विभागात 50 कोटी 21 लाख, अमरावतीत 83 कोटी 9 लाख, नागपूरमध्ये 33 कोटी 1 लाख, पुणे विभागात 20 कोटी 29 लाख आणि कोकण विभागात 3 कोटी 27 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात न जाता शासनाकडे शिल्लक राहिले आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ई-केवायसी न झाल्यामुळेच सर्वाधिक रक्कम अडकली आहे.

Maharashtra Flood Aid: शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

दरम्यान, मदत पोहोचवण्यात झालेला विलंब पाहता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत असून, तांत्रिक प्रक्रियेमुळे हक्काची मदत थांबणे ही चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी काळात शासनाने ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेसाठी विशेष मोहीम राबवून हा निधी तातडीने वितरीत करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Mahayuti Municipal Corporation Election 2025: आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget