एक्स्प्लोर

Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी

भास्कर जाधव यांनी केंद्रीय पथकावरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का?" अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली.

Show Quick Read
Key points generated by AI, verified by newsroom

Winter Session: राज्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (11 डिसेंबर) विधानभवनामध्ये अतिवृष्टीवर चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेमध्ये थेट मंत्र्यांनीच दांडी मारल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सडकून प्रहार केला. जाधव यांनी सलग दुसऱ्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांची उपस्थिती कामकाजामध्ये दिसून येत नसल्याने सत्ताधारी भाजप आमदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली.  भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवर महायुती सरकारवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले, ''एनडीआरएफचे निकष तुम्ही वाढवले आहेत का? कापूस, संत्री, कांदा असेल यांचं वाटोळं झालं आहे. कोकणामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे." ते पुढे म्हणाले की "बिहारमध्ये कोणी मदत मागितली होती का? मग इथं कशाला प्रस्ताव मागता?" अशी सवाल भास्कर जाधव यांनी केला. 

केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री?

जाधव यांनी केंद्रीय पथकावरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का?" अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली. पुरवणी मागण्यांवरूनही भास्कर जाधव यांनी सरकारवर सडकून प्रहार केला. "75000 कोटींच्या पुरवण्यात मांडल्या गेल्या, याचा अर्थ तुमचे बजेट पुरतं कोलमंडलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय मदत करणार आहात?" अशी विचारणा त्यांनी केली. राज्याची आर्थिक स्थित बिघडली असल्याचे पुन्हा  सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. 

पुन्हा असे पॅकेज देऊ नका

शेतकऱ्यांना तीन ते चार हेडखाली मदत दिली आहे, त्याला पॅकेज दिले म्हणतात. हे फसवं पॅकेज असल्याचे टीका त्यांनी केली. ते म्हणाले, "पुन्हा असे पॅकेज देऊ नका, शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. 32 हजार कोटींचे पॅकेज दिले असे बोलतात, तर ते सभागृहामध्ये सांगा. शेतकरी कसा उभा राहणार? पूर्वीची व्यवसाय कसे चालणार आहेत? महागाई वाढली असून पिकाचा दर मात्र खाली आला आहे. पुरामुळे तो पुरता उद्ध्वस्त झाला आहे. ही मदत त्याला कशी मिळणार?" अशी विचारणा जाधव यांनी केली.  घोषणा केल्या पण ही पॅकेज फसवी असतात हे सभागृहामध्ये सिद्ध झाल्याचं जाधव म्हणाले. अतिवृष्टी झाल्याने नद्यांनी जमीन खरडून काढली. अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे एका सीजनपुरती मदत करून चालणार नाही. सर्वांचा एकत्र अनुभव करून ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ही चर्चा फक्त किंवा भाषणांपुरती नसल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA Candidates list Mumbai: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मंचावर नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
तारा भवाळकरांनी मंचावर मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
Satej Patil: तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA Candidates list Mumbai: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मंचावर नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
तारा भवाळकरांनी मंचावर मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
Satej Patil: तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
Pimpri Chinchwad MahanagarPalika Election 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत 443 उमेदवारांची माघार, कोणत्या भागातून किती उमेदवार रिंगणात?
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत 443 उमेदवारांची माघार, कोणत्या भागातून किती उमेदवार रिंगणात?
Sachin Pilgaonkar On Trollers: 'टीकाकारांनो...'; ट्रोलर्सना सचिन पिळगावकरांचं सडेतोड उत्तर, आढेवेढे न घेता, जे काय ते सांगून टाकलं
'टीकाकारांनो...'; ट्रोलर्सना सचिन पिळगावकरांचं सडेतोड उत्तर, आढेवेढे न घेता, जे काय ते सांगून टाकलं
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
Vasai Virar Mahanagarpalika Election 2026: मोठी बातमी : ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
Embed widget