एक्स्प्लोर

Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी

भास्कर जाधव यांनी केंद्रीय पथकावरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का?" अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली.

Show Quick Read
Key points generated by AI, verified by newsroom
  • अतिवृष्टीने झालेल्या नुकसानावर विधानभवनात चर्चा; मंत्री गैरहजर.
  • शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर केली जोरदार टीका.
  • शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत फसवी; एनडीआरएफ निकष वाढवा.
  • केंद्रीय पथकाच्या पाहणीवर प्रश्नचिन्ह; पुरवणी मागण्यांवरून सरकारला धारेवर.

Winter Session: राज्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (11 डिसेंबर) विधानभवनामध्ये अतिवृष्टीवर चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेमध्ये थेट मंत्र्यांनीच दांडी मारल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सडकून प्रहार केला. जाधव यांनी सलग दुसऱ्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांची उपस्थिती कामकाजामध्ये दिसून येत नसल्याने सत्ताधारी भाजप आमदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली.  भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवर महायुती सरकारवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले, ''एनडीआरएफचे निकष तुम्ही वाढवले आहेत का? कापूस, संत्री, कांदा असेल यांचं वाटोळं झालं आहे. कोकणामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे." ते पुढे म्हणाले की "बिहारमध्ये कोणी मदत मागितली होती का? मग इथं कशाला प्रस्ताव मागता?" अशी सवाल भास्कर जाधव यांनी केला. 

केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री?

जाधव यांनी केंद्रीय पथकावरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का?" अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली. पुरवणी मागण्यांवरूनही भास्कर जाधव यांनी सरकारवर सडकून प्रहार केला. "75000 कोटींच्या पुरवण्यात मांडल्या गेल्या, याचा अर्थ तुमचे बजेट पुरतं कोलमंडलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय मदत करणार आहात?" अशी विचारणा त्यांनी केली. राज्याची आर्थिक स्थित बिघडली असल्याचे पुन्हा  सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. 

पुन्हा असे पॅकेज देऊ नका

शेतकऱ्यांना तीन ते चार हेडखाली मदत दिली आहे, त्याला पॅकेज दिले म्हणतात. हे फसवं पॅकेज असल्याचे टीका त्यांनी केली. ते म्हणाले, "पुन्हा असे पॅकेज देऊ नका, शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. 32 हजार कोटींचे पॅकेज दिले असे बोलतात, तर ते सभागृहामध्ये सांगा. शेतकरी कसा उभा राहणार? पूर्वीची व्यवसाय कसे चालणार आहेत? महागाई वाढली असून पिकाचा दर मात्र खाली आला आहे. पुरामुळे तो पुरता उद्ध्वस्त झाला आहे. ही मदत त्याला कशी मिळणार?" अशी विचारणा जाधव यांनी केली.  घोषणा केल्या पण ही पॅकेज फसवी असतात हे सभागृहामध्ये सिद्ध झाल्याचं जाधव म्हणाले. अतिवृष्टी झाल्याने नद्यांनी जमीन खरडून काढली. अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे एका सीजनपुरती मदत करून चालणार नाही. सर्वांचा एकत्र अनुभव करून ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ही चर्चा फक्त किंवा भाषणांपुरती नसल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Vishwas Nangre Patil: आता गुन्हेगारांची खैर नाही, नागपूरमध्ये पोलिसांना 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
आता गुन्हेगारांची खैर नाही, नागपूरमध्ये पोलिसांना 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले? 
चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले? 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget