एक्स्प्लोर

ABP Majha Exclusive : इस्राईल-हमास युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला ब्रेक; सरकार ठोस पाऊल उचलणार का? शेतकऱ्यांचे लक्ष

Nashik Grape Export : 'भारताची द्राक्ष राजधानी' म्हणून नाशिकची ओळख आहे. परदेशी नागरिकही नाशिकच्या द्राक्षांच्या प्रेमात आहेत. जगातील सर्वात स्वस्त आणि उच्च दर्जाचे द्राक्ष म्हणूनही भारताचे द्राक्ष ओळखले जातात.

ABP Majha Exclusive : सध्या इस्त्राईल आणि हमासमध्ये युद्ध (Israel-Hamas War) सुरु आहे. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून (Suez Canal and Red Sea) होणारी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे भारतातून युरोपियन देशात होणारी द्राक्ष निर्यात (Grape export) जहाज वाहतूक कंपन्यांनी थांबवली असून राज्यातील द्राक्ष निर्यातीला सध्या ब्रेक लागला आहे. भारत सरकार या परिस्थितीवर ठोस पावलं उचलणार का? याकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.   

'भारताची द्राक्ष राजधानी' म्हणून नाशिकची ओळख आहे. परदेशी नागरिकही नाशिकच्या द्राक्षांच्या प्रेमात आहेत. जगातील सर्वात स्वस्त आणि उच्च दर्जाचे द्राक्ष म्हणूनही भारताचे द्राक्ष ओळखले जातात. युरोप देश हा पूर्णतः आपल्या द्राक्षांवरच अवलंबून असतो. चिली आणि साऊथ आफ्रिका हे तिथे आपले मुख्य स्पर्धक असतात मात्र त्यांना मागे टाकत त्या बाजारपेठेवर भारतीय द्राक्षांनी कबजा मिळवला आहे.

इस्त्रायल-हमास युद्धाचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर

युरोपियन देशात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तिन महिन्याचा द्राक्षांचा मुख्य हंगाम असतो, मात्र हा हंगाम सुरु होण्याच्या तोंडावरच भारतातून युरोप देशात होणारी द्राक्षांची निर्यात ठप्प झाली आहे. याला कारण ठरलंय ते म्हणजे इस्त्राईल आणि हमासमध्ये सुरु असलेलं युद्ध. या युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर कसा परिणाम होतोय याबाबत नाशिकचे द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे (Rajaram Sangle) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

राजाराम सांगळे म्हणाले की, लाल समुद्रामधून सुएझ कालव्याला जोडण्यासाठी गाझापट्टी हा मार्ग सर्वात सोईस्कर आहे. त्यामुळे त्या मार्गाला अतिशय महत्व आहे. म्हणूनच अतिरेक्यांनी तिथे हल्ले केले. परिणामी मोठमोठ्या जहाजांच्या कंपन्यांनी त्या भागातून प्रवास करणे बंद केले. कारण या जहाजांच्या किमती हजारो कोटींमध्ये आहेत. एका जहाजावर सुमारे 4 ते 8 हजार कंटेनर्स असतात. त्यामुळे सर्व कंपन्यांनी घोषणा केली की, आम्ही आता लाल समुद्रातून प्रवास करणार नाही. यावर दुसरा मार्ग म्हणजे संपूर्ण आफ्रिकेला वळसा घालून युरोपला जावे लागते. 

द्राक्ष खराब होण्याची भीती

सुएझ कालव्यामार्गे युरोप देशात जाण्यासाठी सुमारे नऊ हजार किलोमीटरचे अंतर पार करण्यास सुमारे 21 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र आफ्रिकेकडून प्रवास करताना सुमारे 19 हजार किमीचा पल्ला गाठावा लागतो. त्यासाठी किमान 34 ते 38 दिवस लागतात. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जहाज कंपन्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक कंपन्यांनी थांबवली असून परिणामी भारतातून युरोपियन देशात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसणार असून द्राक्षदेखील खराब होण्याची भीती आहे. 

10 ते 15 टक्केच निर्यात

नाशिकचा द्राक्षाचा हंगाम हा 15 जानेवारीपासून सुरु होतो. मात्र अद्याप कुठेच हालचाल नाही. एकट्या महाराष्ट्रातूनच आठवड्याला 400 ते 500 कंटेनर युरोपियन देशात जातात. तर सिझनमध्ये 8 ते 10 हजार कंटेनर जातात. या युद्धामुळे सध्या केवळ 10 ते 15 टक्केच निर्यात होत आहे. 

वाहतूक पूर्वपदावर कधी येणार?

एकंदरीतच सरकारकडून याबाबत काही पाऊलं उचलतात का? याकडेच निर्यातदारांचे लक्ष लागलेलं असतानाच दुसरीकडे या सर्व परिस्थितीवर तोडगा काढत पाऊलं उचलण्यास केंद्र सरकरने सुरुवात केली आहे. अरबी समुद्र आणि लाल समुद्रातून जी जहाजे जातील त्याला सुरक्षा दिली जाईल असं सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतंच स्पष्ट करत हल्ले परतवले जातील, असा इशारादेखील अतिरेकी संघटनांना दिला आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाहतूक पूर्वपदावर नक्की कधी येणार? आणि युरोपियन देशात द्राक्ष निर्यात सुरू होऊन दिलासा कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांसह द्राक्ष निर्यातदारांचे लक्ष लागलेले आहे.

आणखी वाचा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Embed widget