मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
पाण्यात बुडून 3 युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर, एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना, दुसरीकडे पाण्यात बुडून मृत्यमुखी पडलेल्या काही दुर्घटना मागील आठवड्यात घडल्या आहेत. उजनी, इगतपुरी, प्रवरागनर येथे पाण्यात बुडून अनेकजण दगावल्याची घटना घडली. त्यातच, नांदेड (Nanded) जिल्ह्यातून आणखी एका दुर्दैवी घटना समोर आली आहे. किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात (Drown) बुडून 3 युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (12 वर्षे,) पायल देविदास कांबळे (16 वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (19 वर्ष) रा.मारेगाव (खालचे) ता.किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किवटजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एकीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण्यात आले आहे. याप्रकरणी, घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मामीडवार हे करीत आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर, एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना, दुसरीकडे पाण्यात बुडून मृत्यमुखी पडलेल्या काही दुर्घटना मागील आठवड्यात घडल्या आहेत. उजनी, इगतपुरी, प्रवरागनर येथे पाण्यात बुडून अनेकजण दगावल्याची घटना घडली.
त्यातच, आता आणखी एक धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे. किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून 3 युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (12 वर्षे), पायल देविदास कांबळे (16 वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (19 वर्ष) रा.मारेगाव (खालचे) ता.किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
किनवटजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एकीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबासोबत गेल्या होत्या सहलीला
नांदेडमध्ये पैनगंगा नदीमध्ये बुडून 3 मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मुली आपल्या कुटुंबीयांसोबत सहलीसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्या आहेत. या मुलींचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा