एक्स्प्लोर

नागपूरमध्ये भरचौकात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या

नागपुरात अशा घटना घडण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही भरचौकात हत्येचे प्रकार घडले आहेत. गृहमंत्र्यांच्याच नागपुरात कायदा आणि सुव्यावस्थेचे धिंडवडे उडवले जात असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

नागपूर : मुख्यमंत्र्याच्या नागपुरात गुंडगिरीने कळस गाठला आहे. नागपुरात लागोपाठ दोन दिवसात जबर मारहाणीच्या दोन घटना घडल्या आहेत. ज्यात एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे, तर दुसऱ्या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. नागपूरच्या नंदनवन भागातील खरबी परिसरात वर्चस्वाच्या लढाईतून मालवाहू रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. दोन रिक्षाचालकांनी मिळून एका मालवाहू रिक्षाचालकाची निर्घृण हत्या केली आहे. राजेंद्र देशमुख असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. राजेंद्र देशमुख यांना आधी मारहाण करत अर्धमेल्या अवस्थेत ऑटोमध्ये खरबी चौकात आणले, आणि चौकात वाहतूक सुरू असताना त्यांना ऑटोच्या बाहेर काढून, लाठ्या काठ्यांनी मारून हत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात राजेंद्र देशमुखांचा काही लोकांसोबत वाद झाला होता. राजेंद्र यांनी त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे राजेंद्रचे परिसरात वर्चस्व वाढत असल्याचे पाहत आरोपी गोलू ठाकरे आणि एजाज अनिसने त्यांची हत्या केली आहे. दुसरीकडे नागपूरच्या जगनाडे चौक परिसरात पाच जणांनी एकास जबर मारहाण केली आहे. त्यात धीरज टेकाडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. राहुल धकाते, धीरज टेकाडे आणि नितीन इंगळे जगनाडे चौकातील बारमध्ये दारु पिण्यासाठी दुचाकीवरुन गेले होते. दारु पिऊन बाहेर पडल्यावर 5 जण राहुल आणि त्याच्या मित्राच्या दुचाकीवर बसले होते. त्यावरुन आरोपी आणि राहुल यांच्यात वाद झाला. त्यानंतर राहुल आपल्या मित्रांसह तिथून निघून गेला. नितीन आणि धीरज परत तिथे आले आणि धीरजने 5 जणांपैकी एकाच्या कानशिलात लगावली. आणि मग त्या तरुणांनी धीरजला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. राजेश जिवने, उद्देश ऊर्फ दादू पारसी, प्रीतम लोखंडे आणि अभिजीत काळे अशी आरोपींची नावं आहेत. नागपुरात अशा घटना घडण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही भरचौकात हत्येचे प्रकार घडले आहेत. गृहमंत्र्यांच्याच नागपुरात कायदा आणि सुव्यावस्थेचे धिंडवडे उडवले जात असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vishwas Nangre Patil: आता गुन्हेगारांची खैर नाही, नागपूरमध्ये पोलिसांना 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
आता गुन्हेगारांची खैर नाही, नागपूरमध्ये पोलिसांना 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले? 
चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले? 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget