एक्स्प्लोर

Raj Thackeray : 'शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, जाती-जातीत विषही कालवलं'; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

Raj Thackeray on Sharad Pawar : महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे शरद पवारांनी सुरू केलं. 1993 ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

नागपूर : महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे शरद पवारांनी (Sharad Pawar) सुरू केलं. 1993 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. राज ठाकरे हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तयारीसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका

ते पुढे म्हणाले की, लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत योग्य उत्तर देणार हे नक्की, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.  

राज ठाकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप 

शरद पवार यांच्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरू केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत त्यांनी विष कालवलं. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray: लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान

'शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजतायत..', संजय शिरसाटांची तिरकस टोलेबाजी, भाजपलाही सुनावले, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Embed widget