एक्स्प्लोर

आजवर कुठल्याही पक्षाने किंवा युतीने मिळवला नसेल एवढा मोठा विजय मिळवू : मुख्यमंत्री

जेव्हा विरोधी पक्षाच्या आमदाराला अत्यंत महत्वाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष करण्याची वेळ आली. तेव्हा आम्ही चतुराईने गोपाल अग्रवाल यांनाच लोकलेखा समितीचे अध्यक्ष केले असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला.

नागपूर : मुंबईत संयुक्त पत्रकाद्वारे युतीची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती प्रचंड मोठा यश मिळवेल असा दावा केला आहे. नागपुरात काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांच्या भाजपप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकार  नेहमीच विचारतात की युती किती जागा जिंकणार. मात्र, मी कधीच आकडा सांगत नाही. मात्र यावेळेला न भूतो, न भविष्यती एवढा मोठा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीला मिळेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. असा विजय आजवर कुठल्या ही पक्षाने किंवा युती ने मिळवला नसेल एवढा मोठा विजय आम्ही या निवडणुकीत मिळवू असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांनी आज  भाजपमध्ये प्रवेश केला. गोपाल अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संदर्भात एक मोठा गौप्य स्फोट केला. मुख्यमंत्री म्हणाले की 2014 मध्ये जेव्हा भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या आणि बहुमताचा आकडा काहीअंशी लांब राहिला होता. तेव्हा भाजप बहुमताची व्यवस्था करत असताना सर्वात आधी  आमदार  गोपाल अग्रवाल यांनी संपर्क साधला. गरज भासल्यास काँग्रेसकडून आमदारकीचा राजीनामा देण्याची आणि पुन्हा भाजपकडून निवडून येऊन बहुमतापर्यंत जाण्यास मदत करण्याची ऑफर दिली होती. तेव्हा आपण त्यांना काँग्रेसमध्येच थांबण्याची सूचना केली होती. त्यामुळे जरी ते शरीराने काँग्रेस मध्ये होते. तरी मनाने ते आमच्या सोबतच होते असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच जेव्हा विरोधी पक्षाच्या आमदाराला अत्यंत महत्वाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष करण्याची वेळ आली. तेव्हा आम्ही  चतुराईने  गोपाल अग्रवाल यांनाच लोकलेखा समितीचे अध्यक्ष केले असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. गोपाळ अग्रवाल यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष असताना सर्वात जास्त बैठका घेत आणि सर्वात जास्त अहवाल सादर करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचा दावा फडणवीस यांनी केला. भाजपमध्ये प्रवेश करताना गोपाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती करत ते पक्षीय राजकारणाच्या वर उठून मदत  करणार नेतृत्व असल्याचे मत व्यक्त केले. भाजप मध्ये विकास कामासाठी आलो आहे. मला कुठल्याही इतर लाभाची अपेक्षा नाही असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget