एक्स्प्लोर

मविआ सरकारचा निर्णय बदला, सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड पुन्हा जनतेतून करा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

Chandrashekhar Bawankule : मविआ सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारचा निर्णय बदलला आणि सरपंच आणि नगराध्यक्षांची जनतेतून होणारी निवड रद्द केली. 

मुंबई: नुकतंच सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काही निर्णयांना फिरवण्याचा विचार केला आहे का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे नव्या सरकारने शपथ घेतल्याच्या दोनच दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारचा एक निर्णय बदलण्याची मागणी केली आहे. मविआने फडणवीस सरकारचा बदललेला निर्णय पुन्हा लागू करावा, म्हणजे सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करा अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

सन 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपने आधी महानगरात आपली ताकत वाढविली आणि अनेक महापालिका ताब्यात घेतल्या. ज्या महापालिकेत भाजपची सत्ता आली नाही तिथे भाजपने आपली सदस्य संख्या लक्षणीयरीत्या वाढविली होती. त्यानंतर 2017 मध्ये भाजपने छोटी शहरे आणि ग्रामीण भागात आपली शक्ती वाढवण्यासाठी कायद्यात बदल करत नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच निवडीच्या पद्धतीत बदल केले. नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याऐवजी फडणवीस सरकारने कायद्यात बदल करत त्यांची निवड थेट जनतेतून करण्याचे ठरविले. त्यामुळे अनेक नगरपालिका, नगर पंचायत आणि ग्राम पंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष आणि सरपंच झाले होते. परिणामी वर्षात म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अर्ध नागरी आणि ग्रामीण भागात भाजपने आपली शक्ती ही लक्षणीयरित्या वाढविली होती. 

मात्र, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीसांच्या सरकारचा तो निर्णय परत फिरवला होता. सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याऐवजी निवडून आलेल्या सदस्यांकडून निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. आता तोच निर्णय परत फिरवा आणि सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करा अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे. विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनातच त्यासंदर्भात कायद्यात बदल करण्यात यावा आणि त्यापुढे होणाऱ्या सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका त्याच पद्धतीने घेण्यात याव्या अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दरम्यान, 2017 मध्ये भाजपने कायद्यात केलेल्या बदलांचे फक्त राजकीय पक्षांच्या दृष्टीनेच परिणाम झाले नव्हते तर प्रशासकीयदृष्ट्या ही काही विपरीत परिणाम पाहायला मिळाले होते. अनेक नगरपालिका, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीत बहुतांशी सदस्य एका पक्षाचे तर नगराध्यक्ष किंवा सरपंच दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी बहुमत काँग्रेस-राष्ट्रवादीचे असताना ही सत्ता नगराध्यक्ष किंवा सरपंचाच्या माध्यमातून भाजपच्या हाती राहिली होती. तेच हेरून महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये फडणवीसांचे ते निर्णय फिरवत नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड निवडलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय घेतत्याने 2019 ते 2022 पर्यंत अनेक नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची खासकरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शक्ती पुन्हा वाढायला लागली होती.

महाविकास आघाडीचा निर्णय पुन्हा फिरवण्यासाठी आतुर असलेल्या भाजपचा तर्क वेगळाच आहे. भाजपचा दावा आहे की फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये नगराध्यक्ष व सरपंच यांची निवड थेट जनतेतून सुरु झाल्यामुळे नगरपालिका आणि ग्राम पंचायतीत खेचाखेचीचं राजकारण बंद झालं होत. त्यामुळे विकासावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत होते. 2019 मध्ये महाविकास आघाडीने पूर्वीच्या युती सरकारचा निर्णय बदलवत निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष व सरपंच निवडीचा निर्णय घेतल्यामुळे नगरपालिका आणि ग्राम पंचायतीत पुन्हा फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वीच फोडाफोडीच्या राजकारणातून सत्तांतर झाले आहे. आता तसेच फोडाफोडीचे राजकारण नगरपालिका व ग्रामपंचायतीतून हद्दपार करण्यासाठी आम्हाला कायद्यात बदल करायचा आहे असा भाजपाचे तर्क आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या मुद्द्यावर राज्याचा राजकारण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत.   

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Rathod : पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...
पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा अन् म्हणे...
Babanrao Taywade: ओबीसी आरक्षणाला सध्या तरी कोणताही धक्का नाही, पण जरांगे यांच्या दबावामुळे धक्का लागला तर...; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा
ओबीसी आरक्षणाला सध्या तरी कोणताही धक्का नाही, पण जरांगे यांच्या दबावामुळे धक्का लागला तर...; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा
धक्कादायक! राहत्या घरातच आढळला वृद्ध दाम्पत्याचा कुजलेला मृतदेह, नागपूरमध्ये खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल
धक्कादायक! राहत्या घरातच आढळला वृद्ध दाम्पत्याचा कुजलेला मृतदेह, नागपूरमध्ये खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget