एक्स्प्लोर

मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात संपाची ठिणगी, हजारो कामगार संपावर जाण्याच्या तयारीत

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 1 ते 8 ऑक्टोबर पर्यत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू आणि 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर जाऊ. त्यानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण होईल याला पूर्णपणे अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार असं संघटनेचं म्हणणं आहे.

मुंबई : पुढील काही दिवसांत तब्बल 30 लाख मुंबईकरांना विजेचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. कारण मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांनी आता अदानी ग्रुप विरोधात आंदोलनाचं रणशिंग फुंकल आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी संपाचं हत्यार उपासलं आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील 10 वर्षांपासून तब्बल 2 हजार कामगारांची भरती अदानी इलेक्ट्रिसिटीतील विविध विभागात रखडली आहे. ती अद्याप झालेली नाही. जवळपास 12 कर्मचारी कोविड-19 च्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करत असताना मृत्यूमुखी पडले, त्यांना शासनाने जाहीर केलेले 50 लाखांचे विमा कवच मिळालेलं नाही.

टाळेबंदीत दुप्पट काम करून देखील त्याचा योग्य मोबदला कामगारांना मिळालेला नाही. टाळेबंदीत व्यवस्थापनाच्या चुकीमुळे तिप्पट दराने वीजबिलं काढण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. या असंतोषाचा सामना प्रत्यक्षात कामगारांना करावा लागत आहे. दूरचा प्रवास करून कामगार कामावर येतं आहेत, त्यांची प्रवासबिलं मंजूर केली जातं नाहीत. कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत आलेल्या कामगाराना प्रमोशन किंवा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली होती परंतु ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही, असं मुंबई वर्कर्स युनियनचं म्हणणं आहे. या मागण्या पुढील काही दिवसांत मान्य न झाल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड म्हणाले की, कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करत आहे. याबाबत युनियनकडे वारंवार तक्रारी प्राप्त होतं आहेत. त्यामुळे आमच्या मान्यता प्राप्त मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने कामगारांचे याबाबत काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मतदान घेतलं. या मतदानाच्या माध्यमातून एक बाब समोर आली की, तब्बल 95.62 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे संघटनेने काही दिवसांचा कालावधी अदानी ग्रुप, आणि महाराष्ट्र सरकारला दिला आहे. या कालावधीत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 1 ते 8 ऑक्टोबर पर्यत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू आणि 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर जाऊ. त्यानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण होईल याला पूर्णपणे अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे.

युनियनच्या 12 कर्मचारी कोविड-19 च्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करत असताना मृत्यूमुखी पडले त्यांना शासनाने जाहीर केलेले 50 लाखांचे विमा कवच मिळालेलं नाही. टाळेबंदीत दुप्पट काम करून देखील त्याचा योग्य मोबदला कामगारांना मिळालेला नाही. टाळेबंदीत व्यवस्थापनाच्या चुकीमुळे तिप्पट दराने वीजबिलं काढण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. या असंतोषाचा सामना प्रत्येक्षात कामगारांना करावा लागत आहे. दूरचा प्रवास करून कामगार कामावर येतं आहेत त्यांची प्रवासबिलं मंजूर केली जातं नाहीत. कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत आलेल्या कामगाराना प्रमोशन किंवा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली होती परंतु ती आद्यप मान्य करण्यात आलेली या मागण्या आहेत

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget