एक्स्प्लोर

राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता असताना औरंगाबादचं नामांतर का रखडलं?

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत 1988 बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर जून 1995 ला महापालिकेनं ठराव घेतला.

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. दरवेळी औरंगाबाद महापालिका निवडणुकांपूर्वी हा मुद्दा चर्चेला येतो. खरंतर गेल्यावेळी भाजप- शिवसेनेचं सरकार राज्यात होतं तरीही या दोन शहराचं नामांतर होऊ शकलं नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना सुरु झाला आहे. औरंगाबादचं नामांतर व्हावं यासाठी शिवसेना आग्रही आहे तर भाजपनंही शिवसेनेच्या सुरात सूर मिळवलाय. पण राज्यात गेल्यावेळी भाजपचं सरकार असताना नामांतर का केलं नाही असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

पण भाजपनं याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा औरंगाबाद महापालिकेकडे म्हणजेचं शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टोलवलाय. 'गेल्या सरकारच्या काळात म्हणजेच फडणवीस सरकारच्या दरम्यान नामांतराचा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेनं पाठवला नाही.त्यामुळे नामांतर झालं नाही' असं भाजपचे आमदार राम कदम यांनी सांगितलंय. आणि निवडणूक डोळ्यासमोर राजकारण केलं जात असल्याची टीका केलीय.

काय आहे नामांतराचा प्रश्न?

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत 1988 बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर जून 1995 ला महापालिकेनं ठराव घेतला. युतीच्या तत्कालीन मंत्रिमंडळानं अधिसूचना काढली. पण प्रकरण न्यायालयात गेलं. नंतर निकाली निघालं. दरम्यानच्या काळात युतीची राज्यातून सत्ता गेली. त्यामुळे तेव्हा नामांतर बारगळलं. अनिता घोडेले शिवसेनेच्या महापौर असताना 4 जानेवारी 2011 मध्ये महापालिकेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. मध्यंतरी दिल्लीत औरंगजेब मार्गाचे नामांतर एपीजे अब्दुल कलाम करण्यात आलं. त्यावेळी पुन्हा नामांतराचा मुद्दा निघाला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यूपीतील काही शहरांची नावे बदलल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा झाली पण पुढे काहीही झालं नाही. खरंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असताना नामांतर करणं शक्य होतं. पण भाजप आणि शिवसेनेच्या श्रेयवाद आणि टोलवाटोलवीच्या राजकारणामुळे औरंगाबादचं नामांतर काही झालं नाही. आता कुठल्याही क्षणी पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतरचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आता राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागतो की महापालिका निवडणुकीनंतर बासनात जातो हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या

Balasaheb Thorat | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध : बाळासाहेब थोरात

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget