एक्स्प्लोर

औरंगाबाद शहराचं नाव आणि इतिहास; 'संभाजीनगर'ची मागणी कुठून आली?

औरंगबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसेनं आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतराचा मुद्दा हायजॅक केला आहे. मात्र औरंगाबाद शहराचा नावाचा इतिहासही तेवढात मोठा आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे ही गेल्या 30 वर्षांपासूनची मागणी आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तर याच मुद्द्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून लढवली जात आहे. शिवसेना-भाजपची राज्यात दोनदा सत्ता येऊनही त्यांनी या शहराचं नाव बदललं नाही. आता मनसेनंही औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र औरंगाबाद शहराचा इतिहास जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

औरंगाबाद शहर पुरातन आणि इतिहासाचं वरदान असलेलं शहर आहे. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर-ए-अंबरी अशा एक ना अनेक वास्तू या शहराला शशोभित करतात. निवडणुका आल्या की ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्याची मागणी राजकीय व्यासपीठावरुन नेहमीच सुरु होते. गेली 30 वर्ष हा मुद्दा शिवसेना-भाजप प्रतिष्ठेचा बनवत महापालिका निवडणुकीत प्रचार करत सत्तेत आली. मात्र आता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेल्याने मनसे हा मुद्दा काबीज करत औरंगाबादकरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहे.

औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास

मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता. त्यात औरंगाबादचं नाव राजतडक असल्याचं आढळून आलं होतं. हे नाव कुणी ठेवलं, त्या नावाचा वास्तविकतेशी काय संबंध आहे का? यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. या शहराचं प्रसिद्ध नाव म्हणजे खडकी. बेसाल्ट खडकावर वसलेला हा परिसर आहे. त्यात शहरात अगदी प्राचिन असं खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरुन या शहराचं नाव खडकी पडलं असावं, अशी इतिहासात नोंद आहे. त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता. खऱ्या अर्थानं नहरे-ए-अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारुन त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही. कालांतराने 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरुन या शहराचं नाव फतेहनगर असं ठेवलं. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्याने पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर बदलून खुजिस्ता बुनियाद असं ठेवलं. कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आलं आणि त्यानंतर या शहराला सध्याचे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिलं.

औरंगबादमधील सभेत 1988 मध्ये पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरचा नारा दिला होता. तेव्हापासून शिवसेना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेल करते. आजही सामना वर्तमानपत्रात संभाजीनगर असंच लिहलं जातं. यापूर्वी 9 नोव्हेंबर 1995 ला शहराचे संभाजीनगर असं नामकरण करण्यासाठी असाच प्रस्ताव महापालिकेने पाठवला होता. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकारने हा प्रस्ताव रद्द ठरवला होता. औरंगाबाद की संभाजीनगर या वादावरुन महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपने महापालिकेवर 30 वर्ष राज्य केलं. आता महापालिका निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र यातून पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटणार आहे का याचं उत्तर कुणाजवळही नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget