एक्स्प्लोर

कोरोनाच्या संकटानंतर वीकेंड होमची मागणी वाढणार, सुरक्षित घरांसाठीचा पर्याय म्हणून विचार

INMASO या संस्थेने केलेल्या या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कोरोनाचं संकट टळल्यानंतर लोकांचा ओढा वीकेंड होम खरेदीकडे असेल. या निष्कर्षाला पुष्टी देणारी काही निरीक्षणंही या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. कोरोनाच्या काळात शहरांमध्ये राहणं धोकादायक ठरल्याचं सिद्ध झाल्यानंतर आता वीकेंड होम ही गरज बनेल.

मुंबई : कोरोना काळात ठप्प असलेल्या गृहउद्योग व्यवसायाचं भवितव्य कसं असेल, याबद्दल प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. असं असताना आता गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. कोरोनानंतरच्या जगात वीकेंड होमना प्रचंड मागणी असेल, असा निष्कर्ष INMASO या संस्थेने केलेल्या अभ्यासातून निघाला आहे. कोरोनासारखं संकट पुन्हा आल्यास एक सुरक्षित जागा म्हणून लोक या वीकेंड होमचा विचार करतील, असंही या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे कोरोनानंतर मुंबई महानगर प्रदेशात 1.80 लाख आणि पुणे महानगर प्रदेशात 54 हजार वीकेंड होमची मागणी असेल.

INMASO ही संस्था गेली 15 वर्षं बांधकाम क्षेत्रात सल्लागार म्हणून काम बघत आहे. कोरोनाच्या संकटाची मोठी झळ सध्या बांधकाम उद्योगाला बसली आहे. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांना गिऱ्हाईक मिळणे कठीण झाले आहे. मोठ्या शहरांमधून मजुरांचं स्थलांतर झाल्यानेही अनेक प्रकल्प रखडले आहेत. अशा परिस्थितीत बांधकाम व्यावसायिक सरकारकडे मोठ्या आशेने बघत आहेत.

या पार्श्वभूमीवर INMASO या संस्थेने केलेल्या या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कोरोनाचं संकट टळल्यानंतर लोकांचा ओढा वीकेंड होम खरेदीकडे असेल. या निष्कर्षाला पुष्टी देणारी काही निरीक्षणंही या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. यापूर्वी वीकेंड होम म्हणजे एक महत्त्वाकांक्षा किंवा स्वप्नपूर्ती या दृष्टीने बघितले जात होते. पण कोरोनाच्या काळात शहरांमध्ये राहणं धोकादायक ठरल्याचं सिद्ध झाल्यानंतर आता वीकेंड होम ही गरज बनले, असं मत या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या अहवालात वीकेंड होमचे भविष्यात असलेले फायदे या मुद्द्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ वर्क फ्रॉम होमची सुविधा देऊ केली आहे. भविष्यात आणखी कंपन्या हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक लोक शहरात धकाधकीच्या आयुष्यात राहण्यापेक्षा या वीकेंड होमलाच आपलं कायमस्वरूपी घर बनवण्याची शक्यता आहे.

शहराजवळ पण निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं आणि इंटरनेटची चांगली सुविधा असलेलं वीकेंड घर हे आता नेहमीच्या घराला पर्याय बनू शकेल, असं हा अहवाल म्हणतो. त्याशिवाय कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर आलेली संक्रांत पाहता पुढल्या काही काळात लोक पर्यटनासाठी बाहेर पडणे अशक्य आहे. अशा वेळी वीकेंड होम हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असंही या अहवालात नमूद केलं आहे. तसेच या ग्राहकांकडून प्लॉट विकत घेतले जाण्यापेक्षा अपार्टमेंट किंवा व्हिला घेतल्या जातील, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.

या अभ्यासानुसार मुंबई-पुण्याजवळ खंडाळा, लोणावळा, इगतपुरी, मुरबाड, अलिबाग, कर्जत, तळेगाव, खोपोली-पाली रोड, वाडा, डहाणू अशा ठिकाणी घरांची मागणी वाढेल. मुंबई महानगर प्रदेशात ही मागणी 1.80 लाखांच्या घरात असेल, तर पुण्यात साधारण 54,000 ग्राहक वीकेंड होममध्ये पैसे गुंतवतील, असा अंदाजही INMASO चे संस्थापक संतोष नाईक यांनी व्यक्त करण्यात आला आहे.

वीकेंड होम खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे वर्गीकरण

वित्त व्यवस्थापन बॅंक लोन घेऊन घर घेणारे- 73 टक्के सेल्फ फंडातून घर घेणारे- 27 टक्के

शिक्षण पदवीधर- 63 टक्के पदवीधर नाही- 12 टक्के प्राथमिक शिक्षण- 4 टक्के पदव्युत्तर आणि व्यावसायिक- 21 टक्के

वीकेंड होम खरेदी करणाऱ्यांचा व्यवसाय पगारदार- 46 टक्के व्यावसायिक- 38 टक्के प्रोफेशनल- 18 टक्के

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Badlapur Local Train: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
Embed widget