एक्स्प्लोर

'मातोश्री'वरील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेच्या मंत्र्यांची कानउघडणी

मुंबई: 'मातोश्री'वर झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. जिल्हा परिषद प्रचाराला सर्वांनाच जावं लागेल आणि ग्रामीण भागात सभा घ्यावाच लागतील.' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना ठणकावलं आहे. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना मंत्र्यांनी दौरे न केल्यानं उद्धव ठाकरेंनी नाराजीही व्यक्त केल्याचं समजतं आहे. युतीत असो किंवा नसो मंत्र्यांची निवडणुकीसाठी काय तयारी आहे.  याचा आढावाही उद्धव ठाकरे या बैठकीत घेतला. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक केसरकर खासदार अनिल देसाई यांच्यासह इतर मंत्री आणि आमदारही हजर होते. दरम्यान, राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये, म्हणून युती गरजेची असल्याचं मत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल राज्यभरातले पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं. नगरपालिका निवडणुकीत भाजप हा एक क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पण या निवडणुकीत काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फारसा फटका बसलेला नाही. त्यामुळे राज्यातला काँग्रेस पक्ष कमकुवत करायचा असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आवश्यक असल्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं कळतं. युती तुटली, तर भाजप आणि शिवसेनेच्या संघर्षात काँग्रेसला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी स्थानिक पातळ्यांवर युतीची चर्चा सुरु करण्याचे आदेशही दिले गेल्याचं समजतं. मुंबईत भाजप स्वबळावर लढल्यास भाजपला शंभरहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून बांधण्यात आला आहे. उलट युती केल्यास त्याचा लाभ शिवसेनेला अधिक होण्याची चिन्हं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भाजपने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भाजप स्वबळावर लढल्यास शंभरच्या आसपास जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अगदी कमीतकमी म्हणजे 85 जागा तरी निश्चित मिळवता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेशी जागावाटपात नमते घेऊन 100 पर्यंत जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा सरळ लढत द्यावी, असा भाजपच्या नेत्यांचा कल आहे. दुसरीकडे स्वबळावर लढल्यास प्रचारात शिवसेना-भाजपमधील संबंध कमालीचे बिघडतील. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेची मुख्यमंत्री फडणवीस यांना काहीशी चिंता भेडसावत आहे. तरी स्वबळावर लढून निवडणुकांचे निकाल पाहून कल्याण-डोंबिवली प्रमाणे पुढची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या: युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची सेना मंत्र्यांसोबत तातडीची बैठक ...म्हणून युती गरजेची, खलबतांनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget