एक्स्प्लोर

..तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र

भारतीय अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी देण्यात राज्यांची प्रमुख भूमिका असेल आणि जर कोणतीही मदत मिळाली नाही. तर केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, त्यात राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत, असं शरद पवार यांनी पत्रात लिहलं आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. परिणामी राज्याचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे राज्याचा आरोग्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे केंद्राने राज्याला मदत करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक व्यवस्था कोलमोडली आहे, त्यामुळे राज्याने कर्ज काढण्यापेक्षा केंद्राने कर्ज काढून राज्यांना मदत करण्याचं आवाहन शरद पवार यांनी पत्रातून केला आहे. सोबतचं या संकटात राज्यांना मदत मिळाली नाही, तर केंद्र सरकार अर्थव्यस्थेला उभारी देण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, त्यात राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत, असंही पत्रात म्हटले आहे.

शरद पवार यांच्या अगोदर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मदतीसाठी केंद्राला दोन पत्र लिहली आहेत. मात्र, त्याला केंद्राकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता शरद पवार यांनी केंद्राल पत्र लिहून राज्याला आर्थिक मदत करण्याची गरज व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्र राज्याच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पात अंदाजे 3,47,000 कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा होती. लॉकडाऊनमुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून अल्पावधीत राज्य आर्थिक भरारी घेण्याची शक्यता धुसर आहे. सुधारित अंदाजानुसार अपेक्षित महसुलाची तूट 1,40,000 कोटी इतकी असेल. अंदाजित महसूल नेहमीच्या अपेक्षेत साधारणतः 40 टक्के आहे. त्यामुळे राज्याच्या वित्तपुरवठ्यात मोठी पोकळी निर्माण होणार आहे. सध्याच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेनुसार (जीएसडीपीच्या 3%) राज्य 92,000 कोटी इतके कर्ज घेऊ शकते, त्यापैकी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या भांडवली खर्चाची गरज भागविण्यासाठी 54,000 कोटींचे कर्ज घेण्याची योजना आखली गेली आहे.

वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

यावरून प्रस्तावित प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांच्या तुटीचा सामना सरकारला करावा लागणार आहे. वरील गोष्टी लक्षात घेतल्या तर FRBM अंतर्गत कर्ज घेण्याची मर्यादा वाढविणे आणि अधिक कर्ज घेणे हे एक धोरण असू शकते. मात्र, केवळ उधारीच्या माध्यमातून संपूर्ण उणीव भरून काढल्यास, राज्य संभाव्य कर्जाच्या खाईत ढकलले जाईल. ही बाब लक्षात घेतल्यास सार्वजनिक व्यय कमी करणे हा पर्याय असू शकतो, परंतु हे धोरण तणावातल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल असू शकेल. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण तसंच इतर सार्वजनिक सेवा क्षेत्रात अतिरिक्त खर्चाची आवश्यकता निर्माण होणार आहे. भारत सरकारने दिलेल्या एनएसएसएफ अर्थात राष्ट्रीय अल्प बचत निधी कर्जाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य दरवर्षी 10,500 कोटी रुपयांची परतफेड करते. कर्जाच्या परतफेडीवर दोन वर्षांची मुदतवाढी विनंती केली गेली आहे. संभाव्य अर्थसंकल्पीय दरी भरून काढण्यास त्यामुळे मदत मिळेल.

शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य : किरीट सोमय्या

केंद्राने राज्याला आर्थिक मदत द्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात भारत सरकारने राज्यांना योग्य ती आर्थिक मदत दिली पाहिजे. सध्याच्या संकटाच्या काळात आर्थिक वर्ष 2020-21 साठी महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त अनुदानाची विनंती केली आहे. अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी जवळपास सर्वच देशांनी जीडीपीच्या जवळपास 10% आर्थिक पॅकेजेस जाहीर केली आहेत. अशा प्रकारे, आरबीआयसह भारत सरकारकडून राज्यांना योग्य आर्थिक पॅकेज देण्यासाठी वाव आहे. अगतिक व असहाय्य वित्तीय संस्था, व्यवसाय आणि इतरांसाठी केंद्राने पॅकेजेस जाहीर केली गेली त्याचे स्वागतच आहे. मात्र, अशीच आर्थिक पॅकेजेस राज्यांना दिली जाणे आवश्यक आहे.

कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं : देवेंद्र फडणवीस

तर, राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत भारतीय अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी देण्यात राज्यांची प्रमुख भूमिका असेल आणि जर कोणतीही मदत मिळाली नाही तर केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, त्यात राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत. तूटीचा वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारला फारशी अडचण असू नये. राज्यांनी कर्ज घेण्यापेक्षा केंद्र सरकारने कर्ज घेणे अधिक कार्यक्षम आणि रास्त होईल, असे वाटते. कोविड-19 ने शहरी अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. विमानवाहतूक, वाहतूक, पर्यटन, आतिथ्य, मनोरंजन, माध्यमे आणि स्वयंसेवी संस्था यांसारख्या उद्योगक्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणणे किंवा आर्थिक सुबत्ता या उद्योगांसाठी कठीण आहे. सोशल डिस्टन्सिंग हाताळण्यास असमर्थ असणारे सर्व व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहेत. या व्यवसायांची संख्या रोडावल्याने बर्‍याचजणांच्या नोकर्‍या जातील. त्यांना वैकल्पिक रोजगारासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतील आणि वैकल्पिक व्यवसायांना सक्रियपणे प्रोत्साहन द्यावे लागेल, असा सल्ला पत्रातून शरद पवार यांनी केंद्राला दिला आहे.

Uddhav Thackeray | मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
Samruddhi Mahamarg Utility Corridor : देशातील पहिली 'युटीलिटी कॉरिडॉर' गॅस पाईपलाईन टाकण्याच काम पूर्ण; समृद्धी महामार्ग लगत असलेली भविष्यातील राज्याची 'जीवन वाहिनी'
देशातील पहिली 'युटीलिटी कॉरिडॉर' गॅस पाईपलाईन टाकण्याच काम पूर्ण; समृद्धी महामार्ग लगत असलेली भविष्यातील राज्याची 'जीवन वाहिनी', वाचा A to Z माहिती
25 IAS Officers Transfer Of Maharashtra: मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगरपर्यंत...राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!
मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत...राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय काय म्हणाल्या?
Gold Silver Rates:युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
इराणला 'अश्मयुगा'त नेण्यापूर्वी ट्रम्पनी युद्ध सुरु असतानाच अमेरिकन लष्करप्रमुखांसह तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरी पाठवलं; नेमकं असं काय घडलं?
इराणला 'अश्मयुगा'त नेण्यापूर्वी ट्रम्पनी युद्ध सुरु असतानाच अमेरिकन लष्करप्रमुखांसह तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरी पाठवलं; नेमकं असं काय घडलं?
Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
Ashok Kharat Case Nashik Crime News: Silent मोड, काही प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांनी सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Silent मोड, प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांनी सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Embed widget