एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Sanjay Raut On NDA | एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : संजय राऊत

भाजपच्या कृतीमुळे घोडेबाजार केला जाईल अशी स्थिती निर्माण केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अचानक आत्मविश्वास कसा निर्माण होतो. भाजपला राजभवनातून 30- 35 आमदार मिळाले का? असा सवाल देखील राऊत यांनी केला. त्यामुळे अशाप्रकारची कृती लोकशाहीसाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीए घटक पक्षाची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला शिवसेना जाणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एनडीए बैठकीचा निमंत्रण शिवसेनेला आलेलं नाही, शिवसेनेकडून या बैठकीला कोणीही जाणार नाही. त्यामुळे आता एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त आता औपचारिकता बाकी राहिली आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे. राऊत म्हणाले की, एनडीए कुणाच्या मालकीची नाही. शिवसेना, अकालीदल हे एनडीएचे संस्थापक आहे. जे एनडीएचे सध्याचे सूत्रधार आहेत ते त्यावेळी नव्हते. आम्हाला एनडीएतून दूर होण्यासाठी राज्याची राजकीय परिस्थिती कारण आहे. स्वाभिमानासाठी आम्ही एनडीएतून बाहेर पडलो आहोत, असेही राऊत म्हणाले. जर आता बाहेर पडलो नसतो तर राज्यातील जनतेने आम्हला माफ केले नसते, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊत म्हणाले, गोड आनंदाची बातमी लवकरच महाराष्ट्रला मिळणार त्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री लवकरच राज्याला मिळेणार आहे. शिवाय महाशिवआघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये कोणताच फॉर्म्युला मुख्यमंत्री पदासाठी ठरलेला नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. महापौर निवडणुकीत जिथे शिवसेनेचा महापौर आहे त्या महापालिकेत महापौर शिवसेनेच बसणार आहे. जिथे नाही अशा एक दोन ठिकाणी सुद्धा शिवसेनेचा महापौर बसवू. कुणाचा पाठिंबा घ्यायचा ते शिवसेना ठरवणार आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार 5 वर्ष टिकावं यासाठी सर्व भूमिका प्रत्येक पक्ष समजून घेत असल्याने त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी वेळ लागत आहे, असे राऊत म्हणाले. आजच्या अग्रलेखबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, भाजपच्या कृतीमुळे घोडेबाजार केला जाईल अशी स्थिती निर्माण केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अचानक आत्मविश्वास कसा निर्माण होतो. भाजपला राजभवनातून 30- 35 आमदार मिळाले का? असा सवाल देखील राऊत यांनी केला. त्यामुळे अशाप्रकारची कृती लोकशाहीसाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
Bird flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
Janhavi Kapoor Wedding: जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
Bhor Accident News: भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
Pune Nasrapur Bhor Crime: छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
Tamil nadu Election Result 2026 Thalapathy Vijay: मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
Embed widget