एक्स्प्लोर

'दानव्यांचा नवा डंख!', शिवसेनेचा 'सामना'तून रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल

मुंबई: 'कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असा लेखी प्रस्ताव द्या.' अशी अजब मागणी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर शिवसेनेनं 'सामना'तून हल्लाबोल केला आहे. 'दानव्यांचा नवा डंख!' अशा मथळ्याखाली सामनात आज (बुधवार) दानवेंविरुद्ध अग्रलेख छापण्यात आला आहे. दानवेंनी केलेल्या अजब मागणीवर शिवसेनेनं बरंच तोंडसुख घेतलं आहे. 'दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.' असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चुचकारलं आहे. काय होतं नेमकं प्रकरण? कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत केलं होतं. दानवे म्हणाले, “कर्ज माफ करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे, आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशाप्रकारचा ठोस प्रस्ताव द्यावा, मग त्यावर सरकार विचार करेल” याशिवाय “आमच्यावर काय आरोप होत आहेत, याची आम्हाला चिंता नाही. आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर आहे”, असंही दानवेंनी नमूद केलं. एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर: * सरसकट कर्जमाफीने अर्थव्यवस्था कोलमडेल वगैरे विचार ठीक आहेत, पण जनताच जिवंत राहिली नाही तर तुमच्या त्या अर्थव्यवस्थेस काय पालखीत बसवून मिरवायचे आहे? दानवे यांच्यासारखे पुढारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात विरोधी पक्षाकडे ‘हमी’ मागतात हा तर चेष्टेखोरीचा कळसच झाला. * तोंडावर लगाम ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी करूनही भाजप पुढाऱ्यांच्या जिभांचे तडतडणे सुरूच आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचे काय करायचे, असा प्रश्न आता मुख्यमंत्री फडणवीस यांनाही पडलाच असेल. रावसाहेब दानव्यांनी आता शेतकऱयांच्या दुःखावर डागण्या देत सांगितले आहे की, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या. दानवे यांच्या नव्या तोंडपट्टय़ांमुळे सरकारवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले. दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. शेतकरी जगवण्यासाठी सरकारने आकाशपाताळ एक करायला हवे. महाराष्ट्र राज्य हे शेतकऱयांच्या आयुष्याचे स्मशान झाले आहे व गेल्या दोन वर्षांतच चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात हे काही आमच्या राज्याला भूषणावह नाही. * या भयंकर दुष्टचक्रातून सुटण्यासाठी तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असेल तर ते मायबाप सरकारचेच अपयश आहे. शेतकरी कर्जाच्या अजगरी विळख्यात सापडला आहे. हा विळखा दूर करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांत नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांचे हे असे धिंडवडे तरी काढू नयेत. बरं, दानवे महाशय हे बोलले कुठे, तर साईबाबांच्या शिर्डीत. वास्तविक दर्शनानंतर साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र घेऊनच भाविक शिर्डीतून बाहेर पडतात. तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेमका हाच मंत्र विसरले. दानवेंनी शिर्डीत जे वक्तव्य केले त्यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ‘श्रद्धा’ आहे हे तर समजलेच; शिवाय कसे बोलावे याचे भान सोडून त्यांनी ‘सबुरी’चेही धिंडवडेच काढले. * अर्थात, अशा तऱ्हेने बोलण्याची रावसाहेबांची ही काही पहिलीच वेळ नाही. ‘निवडणुकीच्या एक दिवस अगोदर लक्ष्मीदर्शन होत असते. अशी लक्ष्मी घरी आली तर परत करू नका, तिचे स्वागत करा’, असे आवाहनच दानवे महाशयांनी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मतदारांना केले होते. आता मात्र शेतकरी आत्महत्यांच्या संवेदनशील विषयावरून ते विरोधकांवर घसरले आहेत. खरे तर कर्जमाफी हा कायमचा तोडगा नसून शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी केलेली तातडीची मलमपट्टी आहे. * आज जो उठतोय तो आमच्या शेतकरी बांधवांची चेष्टाच करतोय. शेतकऱयांची मते हवीच आहेत, पण त्यांना मरताना पाणी पाजायला पुढे जायचे नाही, उलट पाणी पाजले तरी तो मरणारच नाही याची गॅरंटी काय? असे मूर्खपणाचे सवाल केले जात आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडास पानेच पुसली आहेत. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची हमी काय? या प्रश्नाच्या दोरीवर तेदेखील उड्या मारीत आहेत. शेतकऱयांच्या गळ्य़ाभोवती लागलेला फास सोडवायला मात्र कोणीच पुढे येत नाही. महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय म्हणायचे! संंबंधित बातम्या: कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
Jalgaon Crime : कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह 3 किलो सोने अन् 8 किलो चांदी; पावत्या नसल्याने मुद्देमाल जप्त, जळगावात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई
निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह सोने-चांदी, पावत्या नसल्याने संशय बळावला
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
Ladki Bahin Yojana : काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
Embed widget