एक्स्प्लोर

खडसेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन, शिवसेनेचे भाजपला जोरदार टोले

मुंबई:  देश हादरवण्याच्या वक्तव्यावरुन जरी खडसेंनी सारवासारव केली असली तरी यावरुन शिवसेनेनं भाजपला चांगलेच टोले लगावले आहेत. खडसेंच्या भाषणातला रोख विरोधकांपेक्षा स्वकीयांवरच जास्त होता, पण यात आम्हाला पडण्याचं काही कारण नाही असं म्हणत शिवसेनेने भाजपला चिमटे काढले आहेत.   यापुढे भाजपमधली अंदर की बात खडसेंनी उघड केली तर पक्षांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाला भाजपला तयार रहावं लागेल असंही सामनात म्हटलं आहे.   एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:   नाथाभाऊंचेही ‘मनोगत’   मंत्रीपदावरून जावे लागलेले एकनाथराव खडसे यांनी छातीठोकपणे सांगितले आहे की, ‘स्वपक्षातील गद्दारांमुळेच आपल्याला सत्तेतून जावे लागले.’ भाजप परिवारातील नाथाभाऊंनी असेही सत्यकथन केले की, ‘माझी बदनामी हे ठरवून केलेले कृत्य आहे.’ जळगावातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खडसे यांनी मन ढसाढसा मोकळे केले आहे. खडसे यांनी मन मोकळे केले असले तरी बर्‍याच गोष्टी मनात गाठ मारून बांधून ठेवल्या आहेत. ही गाठ योग्य वेळी सोडीन व योग्य वेळी गुपिते उघडी करीन तेव्हा देश हादरल्याशिवाय राहणार नाही, असेही खडसे यांनी सांगून टाकले. खडसे यांनी जे सूचक इशारे दिले आहेत ते पाहता भविष्यात एखादे छोटे महाभारत घडले तरी आश्‍चर्य वाटायला नको.   खडसे यांचे जे ‘मनोगत’ प्रसिद्ध झाले आहे त्याचा रोख विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांवरच असला तरी आम्हाला त्यात पडण्याचे कारण नाही. खडसे यांच्या बाबतीत जे घडले तो त्यांच्या पक्षातला ‘अंदर का’ मामला आहे. त्यामुळे नक्की काय झाले याची ‘अंदर की बात’ खडसे यांनाच उघड करावी लागणार आहे व त्यावेळी जे स्फोट होतील त्या हादर्‍यांना सामोरे जाण्यासाठी पक्षांतर्गत आपत्ती व्यवस्थापनास सावधान राहावे लागेल. कारण गुपिते उघड केली तर देश हादरेल असे श्री. खडसे यांनी सांगितले आहे.   खडसे हे चाळीस वर्षे राजकारणात आहेत व त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी कष्ट घेतले आहेत व त्यासाठी जळगावातील अनेक प्रामाणिक शिवसैनिकांवर वार केले आहेत. सत्तेचा वारेमाप गैरवापरही त्यांनी त्यासाठी केला हे सर्वश्रुत असले तरी केवळ त्यामुळे खडसे यांच्यावर आमचा आकस नाही. शिवाय जळगावातील शिवसैनिकही खडसे यांना पुरून उरले आहेत. राजकीय मैदानात हे असे फटाके फुटायचेच. पण खडसे यांचे मंत्रीपद जाताच जळगावातील शिवसैनिकांनी फटाके फोडले हे खडसे यांचे दु:ख नसून स्वपक्षातच ‘दिवाळी’ साजरी झाली या वेदनेचा स्फोट त्यांच्या मुखातून झाला आहे.   शिवसेनेशी युती आपणच तोडल्याची शेखी ते एखाद्या शौर्यचक्राप्रमाणे मिरवीत होते. शिवसेनेशी युती तोडली म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला, पण माझ्या वाट्याला हे काय आले? असा प्रश्‍न खडसे यांनी केला. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. खडसे यांनी शिवसेनेशी युती तोडण्यात पुढचे पाऊल टाकले. कारण त्यावेळी देशात मोदी यांची लाट होती व त्या लाटेत ओंडके व काटक्याही तरंगल्या. आम्हाला त्याची खंत नाही. पण युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे खडसे म्हणतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर आभाळ कोसळले असते काय? याचे चिंतन करण्यास खडसे आता मोकळे आहेत. खडसे यांच्यावर अनेक आरोपांच्या फटाक्यांची माळच लागली. मात्र त्यांच्यावर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही.   दाऊदशी संबंध जोडून खडसे यांच्या देशभक्तीवरच कलंक लावण्याचा प्रकार हा त्यांच्यावर अन्याय ठरतो व याबाबतीत त्यांचे ऐकून घेतले नाही हा त्याहून मोठा अन्याय ठरू शकतो. खडसे यांच्याशी राजकीय लढायला आम्ही समर्थ आहोत. पण एखाद्या विषयात नाहक बदनामी घडवून राजकीय पोळ्या भाजणारे आम्ही नव्हेत. हे सत्य सांगण्याची हिंमत आमच्यात आहे व त्याबद्दल खडसे यांच्या पक्षातील कुणाचा आक्षेप असेल तर त्यांना बोंबलण्याचा आणि ‘सामना’ जाळण्याच्या धमक्या देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget