एक्स्प्लोर

जीव गेल्यावरच मदतीची घोषणा का, रेणुका शहाणेंचा फेसबुकवरुन संताप

‘एखाद्या दुर्घटनेत कोणाचा तरी जीव गेल्यावरच किंवा मोठं नुकसान झाल्यावरच मदतीची घोषणा करणं राजकारण्यांना इतकं सोपं का झालंय,’ असा उद्विग्न सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

मुंबई : अंधेरीतील गोखले ब्रिजचा फुटपाथ कोसळून पाच जण जखमी झाल्याच्या घटनेवरुन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर खरमरीत टीका केली आहे. या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘एखाद्या दुर्घटनेत कोणाचा तरी जीव गेल्यावरच किंवा मोठं नुकसान झाल्यावरच मदतीची घोषणा करणं राजकारण्यांना इतकं सोपं का झालंय,’ असा उद्विग्न सवाल त्यांनी सरकारला केला आहे. रेणुका शहाणेंच्या मते, हा करदात्यांचा पैसा असल्याने नुकसान झाल्यावरच मदत करणं राजकारण्यांना सोपा मार्ग वाटतो. ‘तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की,‘राजकारण्यांना किंवा प्रशासनातील लोकांना ज्या कामासाठी निवडलं गेलंय त्यांना ते काम का करता येत नाही?’ तर त्याचं उत्तर सोपं आहे. सरकारने अशी कामं केली तर त्यांना पैसाही खाता येणार नाही आणि अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली परदेशातही फिरायला जाता येणार नाही’, असं रेणुका शहाणेंनी म्हटलं आहे. ‘सरकारच्या अशा वागण्याला अजून एक कारण आहे, ते म्हणजे मुंबई स्पिरीटच्या नावाखाली दुसऱ्या दिवशी सगळं व्यवस्थित झालेलं असतं,’ असं म्हणत त्यांनी मुंबईकरांच्या शांत बसण्याच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. ‘जनतेने काळ्या पैशावर बोलण्याची हिंमत करु नये. कारण या देशातला सगळा काळा पैसा पांढरा झाल्याची घोषणा सरकारने केली आहेच. त्यामुळे आता कोणताही भ्रष्टाचार राहिलेला नाही’, असं उपरोधिक भाष्य करत त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर फेसबुक पोस्टद्वारे आसूड ओढला आहे. अंधेरीत नेमकं काय घडलं? अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत पाच जण जमखी झाले आहेत. फुटपाथ थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने याचा रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळपासून विस्कळीत झाली आहे. दरम्यान, एल्फिस्टन दुर्घटना घडल्यानंतर सर्व रेल्वे पुलांचे ऑडिट केले जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आता अंधेरी दुर्घटना घडल्यानंतर सरकारच्या आश्वासनाचं काय झालं, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
Harshwardhan Sapkal : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Embed widget