एक्स्प्लोर

राज्यातही शेकडो नीरव मोदी, सर्वसामान्यांना कोट्यवधींचा गंडा

राज्यात 184 घोटाळेबाज सर्वसामान्यांना 19 हजार कोटींचा चुना लावून फरार झाले आहेत. यापैकी भाजप सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षात तपास यंत्रणांना फक्त अडीच कोटींची वसुली करणं शक्य झालं आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा चुना लावून गेलेला नीरव मोदी सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी राज्यात छोटे-मोठे अनेक नीरव मोदी आहेत, ज्यांनी बँकेला आणि सर्वसामान्यांना गंडा घातला आहे. राज्यात 184 घोटाळेबाज सर्वसामान्यांना 19 हजार कोटींचा चुना लावून फरार झाले आहेत. यापैकी भाजप सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षात तपास यंत्रणांना फक्त अडीच कोटींची वसुली करणं शक्य झालं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी आरटीआयमधून ही माहिती मिळवली. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत 50 लाखांहून अधिकचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तपासले जातात. यामध्ये विजय मल्ल्या आणि नीरव मोदींसारख्या हाय प्रोफाइल प्रकरणांचा समावेश असतो. मात्र अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये बिल्डर, व्यापारी किंवा पोंजी स्कीम चालवणारे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात गंडा घालून पसार होतात. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईचा वेग मात्र कासवगतीने सुरू असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. गेल्या तीन वर्षात नोंद झालेले गुन्हे
  • 2015 साली 5 हजार 560 कोटींचे घोटाळे
  • 2016 साली 4 हजार 273 कोटींचे घोटाळे
  • 2017 साली 9 हजार 835 कोटींच्या घोटाळ्यांची नोंद
गेल्या वर्षात फक्त 2 आरोपपत्र दाखल गेल्या वर्षात तर फक्त 2 आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी तपास यंत्रणांच्या निराशाजनक कार्यपद्धतीवर बोट ठेवत चिंता व्यक्त केली आहे. राजकीय हस्तक्षेप, प्रशासनातला भ्रष्टाचार आणि अपुरं मनुष्यबळ यामागचं प्रमुख कारणं असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व सामन्यांची आयुष्यभराची संपत्ती लाटून मोकाट फिरणाऱ्या अशा घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करण्यासाठी वेळ आणि मर्यादा निश्चित करण्याची मागणी जितेंद्र घाडगे यांनी केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, वर्षा बंगल्यावर पाऊणतास राजकीय खलबतं, विधानपरिषदेसाठीच्या नावावर शिक्कामोर्तब?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, वर्षा बंगल्यावर पाऊणतास राजकीय खलबतं, विधानपरिषदेसाठीच्या नावावर शिक्कामोर्तब?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
Raj Thackeray On Marathi Compulsory Auto Taxi: रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
Embed widget