एक्स्प्लोर

Mumbai Water Cut: शॉवर वापरु नका, दाढी करणे टाळा; पालिकेकडून मुंबईत पाणीकपात जाहीर, या तारखेपासून अंमलबजावणी

Mumbai Breaking News: जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन. 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार

मुंबई: मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई (Mumbai News) महानगरात गुरुवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात (Water Cut), तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. 

मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र सन २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. 

आज, दिनांक २५ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.

एवढेच नव्हे तर, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे, यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, ही देखील सकारात्मक बाब आहे.

असे असले तरी, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सदर पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही ५ टक्के आणि १० टक्के कपात अनुक्रमे नियत दिनांकापासून लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. 

पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना

दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, अशा सूचना मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेने दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे:

* आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे. 

* घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.

* वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.

* नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱया किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱया तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.

* उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.

* सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो)  नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. 

* ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

एकूणच, पाणी बचतीच्या उपाययोजना अंगीकारणे सहज शक्य आहे. त्याचा अवलंब करुन मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आणखी वाचा

उन्हाची तीव्रता वाढली, बाष्पीभवनामुळे तलावांमधील पाणी आटण्याचा वेग वाढला, मुंबईवर पाणीकपातीचे संकट?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dwarkanath Sanzgiri : क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Akshay Shinde Encounter : बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
Nanded:भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dwarkanath sanzgiri Demise : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधनDada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 06 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dwarkanath Sanzgiri : क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Akshay Shinde Encounter : बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
Nanded:भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
Beed Crime: नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
Devendra Fadnavis : महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीचं अध्यक्षपद कुणाकडे?
एकीकडे पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय
Anjali Damania : धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
Embed widget