एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

मुंबईवरचा निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला; पोस्ट लॅन्डफॉलचे परिणाम दिसणार

आज रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील. दरम्यान वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास एवढा असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबई : मुंबईवरचा निसर्ग वादळाचा धोक कमी झाला आहे. चक्रीवादळाची धोक्याची तीव्रता कमी झाली आहे. आता केवळ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतरचे पोस्ट लॅन्डफॉल परिणाम दिसत आहेत. यामुळे मुंबईत पुढचे दोन तास जोरदार वारे आणि पाऊस अनुभवायला मिळेल. आज रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील. दरम्यान वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास एवढा असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तर, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती स्कायमेटनं दिलीय. अलिबागच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यातून पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. वादळ मुंबईच्या बाजूनं थोडं पुढे सरकलेलं असलं तरीही लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

बीकेसी येथील कोव्हिड सेंटरचं थोडंफार नुकसान

निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला देखील बसला आहे. कोव्हिड सेंटरच्या बाहेरच्या बाजूने जे पत्रे लावण्यात आले होते. ते वादळामुळे पडले आहेत. यासोबतच या ठिकाणी जे दुसरे कोव्हिड सेंटर बनवण्यात येत आहे, त्याचेही थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. या संपूर्ण परिस्थितीचा स्थानिक पोलिस प्रशासन आणि महापालिका कर्मचारी यांच्याकडून आढावा घेण्यात येतं आहे.

कोकण किनारपट्टीला सर्वाधिक फटका

निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीला बसला. किनारपट्टीवर धडकल्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी पत्रे उडाले, विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचं पाहायला मिळालं. अलिबाग शहर, मुरुड, कोर्लाई भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. विद्युत जोडणीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्यात मोबाईल यंत्रणाही विस्कळीत झाली.

रायगड जिल्ह्यातील दिवेआगार आणि श्रीवर्धनलाही चक्रीवादळाचा फटका बसला. रोहा येथील शासकीय गोदामांचे पत्रे उडाले. मुरुडमध्ये वाऱ्यांचा इतका वेग आहे, की घरांचे पत्रे उडून गेले. अलिबागमध्येही वादळी वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडली आहेत, तर कोर्लाईमध्येही घरांचे पत्रे उडाले. उरणमध्ये मुसळधार पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं.

 Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकीकडे पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयाची चर्चा; दुसरीकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध
एकीकडे पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयाची चर्चा; दुसरीकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
Embed widget