एक्स्प्लोर

Mumbai Lockdown | पोर हिरमुसलं... मुंबईत लॉकडाऊनमुळे आईवडील अन् मुलाची ताटातूट

लॉकडाऊनमध्ये लेकरु आणि आई अगदी अवघ्या काही अंतरावर असूनही भेटू शकत नाहीयेत.

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकून पडले आहेत. काळात अनेक जण आपल्या प्रियजणांपासून दूर आहेत.  मुंबईत देखील एका आईवडील अन् मुलाची ताटातूट झाली आहे.  अचानक लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आई-वडील  मुंबईत तर मुलगा विरारला आजी आजोबांकडे अडकून पडले आहेत.
सात वर्षाचा आरिव आयरे. दुसऱ्या इयत्तेतील परीक्षा 10 मार्चला झाली. आणि त्याला आनंद झाला. आता सुट्ट्या मिळाल्या याचा आनंद त्याला झाला.  आरिवची आई वैशाली आणि वडील अशोक दोघेही नोकरीला जातात. आरिवला घरी एकटं सोडणे शक्य नव्हते म्हणून थोड्या दिवसासाठी त्यांनी मुलाला आजी आजोबांकडे विरारला पाठवले. तेव्हा कुणाला वाटलंच नव्हतं की कोरोनाचे संकट इतकं मोठं होईल. लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल.कोणीच प्रवास करू शकणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि आरिव आजी आजोबांकडे आणि आई वडील पार्ल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. आरिवला आजीआजोबा, आईवडिलांनी सगळी परिस्थिती समजवून सांगितली. 14 एप्रिलपर्यंतच वेळ काढायचा आहे. मग सगळं ठीक होईल असं सांगितल्यामुळे तो चिमुरडाही तयार झाला. सुरुवातीला आरिव रमला मग नंतर कॅलेंडरवर दिवस मोजत दररोज आई वडिलांशी व्हिडीओ कॉल मधून बोलत 14 तारखेची वाट पाहत होता.
आणि लॉकडाऊन पुन्हा 3 मे पर्यंत वाढवला. हे कळल्यावर चिमुकला आरिव हिरमुसला. इतके दिवस कधीच तो आईपासून लांब राहिला नाही. आरिव आईला फोन करून सांगतो. 'मी चालत येतो आई, तू माझी काळजी नको करू'. आई वडील,आजी आजोबा सगळे त्याची समजूत दररोज काढतात पण तो पुन्हा कॅलेंडर बघून दिवस मोजत आहे.
मुंबईत नोकरीमुळे विभक्त राहणारी अनेक कुटुंब आहेत. परीक्षा झाल्यावर अनेकदा मुलांना आजी आजोबांकडे सोडलं जातं.पण कोरोनामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती आली. आई आणि मुलाची ताटातूट झाली तरी जबाबदार नागरिक म्हणून वैशाली आणि अशोक आपल्या मुलापासून दूर आहेत त्याला आजही समजवत आहेत. पण पोलिसांनी परवानगी दिली तर मुलाला घेऊन येण्याची इच्छाही आहे. लॉकडाऊनमध्ये लेकरू आणि आई अगदी अवघ्या काही अंतरावर असूनही भेटू शकत नाही हे चित्र नक्कीच हेलावून सोडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget