एक्स्प्लोर

Mumbai Lockdown | पोर हिरमुसलं... मुंबईत लॉकडाऊनमुळे आईवडील अन् मुलाची ताटातूट

लॉकडाऊनमध्ये लेकरु आणि आई अगदी अवघ्या काही अंतरावर असूनही भेटू शकत नाहीयेत.

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकून पडले आहेत. काळात अनेक जण आपल्या प्रियजणांपासून दूर आहेत.  मुंबईत देखील एका आईवडील अन् मुलाची ताटातूट झाली आहे.  अचानक लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आई-वडील  मुंबईत तर मुलगा विरारला आजी आजोबांकडे अडकून पडले आहेत.
सात वर्षाचा आरिव आयरे. दुसऱ्या इयत्तेतील परीक्षा 10 मार्चला झाली. आणि त्याला आनंद झाला. आता सुट्ट्या मिळाल्या याचा आनंद त्याला झाला.  आरिवची आई वैशाली आणि वडील अशोक दोघेही नोकरीला जातात. आरिवला घरी एकटं सोडणे शक्य नव्हते म्हणून थोड्या दिवसासाठी त्यांनी मुलाला आजी आजोबांकडे विरारला पाठवले. तेव्हा कुणाला वाटलंच नव्हतं की कोरोनाचे संकट इतकं मोठं होईल. लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल.कोणीच प्रवास करू शकणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि आरिव आजी आजोबांकडे आणि आई वडील पार्ल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. आरिवला आजीआजोबा, आईवडिलांनी सगळी परिस्थिती समजवून सांगितली. 14 एप्रिलपर्यंतच वेळ काढायचा आहे. मग सगळं ठीक होईल असं सांगितल्यामुळे तो चिमुरडाही तयार झाला. सुरुवातीला आरिव रमला मग नंतर कॅलेंडरवर दिवस मोजत दररोज आई वडिलांशी व्हिडीओ कॉल मधून बोलत 14 तारखेची वाट पाहत होता.
आणि लॉकडाऊन पुन्हा 3 मे पर्यंत वाढवला. हे कळल्यावर चिमुकला आरिव हिरमुसला. इतके दिवस कधीच तो आईपासून लांब राहिला नाही. आरिव आईला फोन करून सांगतो. 'मी चालत येतो आई, तू माझी काळजी नको करू'. आई वडील,आजी आजोबा सगळे त्याची समजूत दररोज काढतात पण तो पुन्हा कॅलेंडर बघून दिवस मोजत आहे.
मुंबईत नोकरीमुळे विभक्त राहणारी अनेक कुटुंब आहेत. परीक्षा झाल्यावर अनेकदा मुलांना आजी आजोबांकडे सोडलं जातं.पण कोरोनामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती आली. आई आणि मुलाची ताटातूट झाली तरी जबाबदार नागरिक म्हणून वैशाली आणि अशोक आपल्या मुलापासून दूर आहेत त्याला आजही समजवत आहेत. पण पोलिसांनी परवानगी दिली तर मुलाला घेऊन येण्याची इच्छाही आहे. लॉकडाऊनमध्ये लेकरू आणि आई अगदी अवघ्या काही अंतरावर असूनही भेटू शकत नाही हे चित्र नक्कीच हेलावून सोडणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषणABP Majha Headlines 4 PM Top Headlines  4 PM 1 April 2025 संध्या 4 च्या हेडलाईन्सAditya Thackeray Full PC : 'हा 'अदानी कर' लादला जातोय, घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
Embed widget