एक्स्प्लोर

तुंबापुरी ते सूर्यदर्शन, मुंबईत दिवसभरात काय-काय घडलं?

पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईत दुपारनंतर कडकडकीत उन पडलं. काल दिवसभराच्या दमदार पावसानंतर, रात्रभर पावसाने उसंत घेतली, मात्र आज सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली होती.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला तुफान पावसाने झोडपून काढलं आणि कधीही न थांबणारी मुंबई थांबली. रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं. परिणामी वाहतूक विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. या सर्व अभूतपूर्व परिस्थितीनंतर थांबलेली मुंबई पुन्हा एकदा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईत दुपारनंतर कडकडकीत उन पडलं. काल दिवसभराच्या दमदार पावसानंतर, रात्रभर पावसाने उसंत घेतली, मात्र आज सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली होती. पण दुपारनंतर पाऊस कमी कमी होत आला आणि त्यानंतर चक्क उन पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. असं असलं तरी मध्य आणि हार्बर रेल्वेने टाकलेली मान कायम होती. दुपारनंतर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर रेल्वे ट्रॅकववर पाणी भरल्याने 29 ऑगस्टला दिवसभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. आज सकाळी देखील हीच परिस्थिती असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिल्यानंतर मुंबईकरांनी घराबाहेर पडणं टाळलं. अखेर पाणी कमी झाल्यानंतर युद्ध पातळीवर प्रयत्न करुन वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावत असल्या तरी त्या उशीराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरही अशीच परिस्थिती आहे. मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सीएसएमटी-कल्याण विशेष ट्रेन सकाळी  7.26 मिनिटांनी रवाना करण्यात आली. तर सीएसएमटीहून कल्याणला जाणारी दुसरी विशेष ट्रेन 7.44 मिनिटांनी रवाना झाली.  हार्बर रेल्वेवरील वाहतूकही सकाळच्या वेळेला सुरु करण्यात आली. सीएसएमटीवरुन पनवेलसाठी पहिली विशेष लोकल 9.03 वाजता रवाना झाली. मात्र पनवेलहून सीएसएमटीला जाणारी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत रवाना होणार नाही, अशी अनाऊन्समेंट टिळकनगर स्टेशनवर सकाळी अकराच्या आसपास करण्यात आली.  दरम्यान दिवसभर पनवेल ते वाशी आणि त्यानंतर काही वेळाने पनवेल ते कुर्ला अशी वाहतूक सुरु होती. मध्य रेल्वे पावसामुळे मध्य रेल्वेवर खोळंबलेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीवरुन सकाळी 7.26 ला कल्याणकडे जाण्यासाठी पहिली लोकल सुटली. त्यानंतर मागोमाग दुसरी लोकलही निघाली, मात्र पुढे सायनजवळ ट्रॅकवर पाणी असल्याने, वाहतूक रखडली. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक काही वेळातच रखडली होती. मात्र दुपारी 1.20 ला मध्य रेल्वेची अप आणि डाऊन फास्ट वाहतूक सुरु झाली. तसंच डाऊन स्लो वाहतूकही सुरु झाली. हार्बर रेल्वे हार्बर मार्गावर सकाळी 9.03 वाजता सीएसएमटीवरुन पनवेलच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. मात्र ही वाहतूकही जास्तवेळ सुरु राहिली नाही. काही क्षणांतच वाहतूक रखडून ती ठप्प झाली. मात्र दुपारनंतर हार्बर मार्गावर कुर्ला ते पनवेल दरम्यान लोकल धावली. आता हार्बर मार्गावरची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र लोकल उशीराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे नेटाने सुरु मध्य आणि हार्बर रेल्वेने नांगी टाकली असली, तरी पश्चिम रेल्वे मात्र नेटाने सुरु आहे. सकाळच्या सत्रात लोकल धीम्या गतीने धावत होत्या. एल्फिन्स्टन स्थानकाजवळील पाण्याचा निचरा न झाल्याने त्यादरम्यान लोकल धीम्या गतीने धावल्या. रस्ते वाहतूक सुरळीत मुंबईत अगोदरच वाहतूक कोंडी असल्यामुळे बाहेरुन मुंबईत येणारी वाहनं थांबवण्यात आली होती. कधीही न थांबणारा एक्स्प्रेस वे देखील मुंबईत येण्यासाठी बंद करण्यात आला होता. तर इकडे नाशिकहून मुंबईला येण्यासाठीचा मार्गही वाहतुकीसाठी बंद होता. अखेर मुंबईच्या दिशेने येणारी पुणे आणि गोवा महामार्गाची वाहतूक रात्री 12 नंतर सुरु करण्यात आली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सकाळच्या वेळेला सुरळीत सुरु होती. रेल्वे वाहतूक बंद असल्याने बेस्टची सीएसएमटी-ठाणे विशेष बससेवा सुरु करण्यात आली.  ईस्टर्न फ्रीवेवरुन वाहतूक सुरळीत सुरु होती. अडकलेल्या लोकांसाठी बेस्टच्या ज्यादा बस सुरु करण्यात आल्या.  सीएसएमटीहून ठाणे, नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या बस खचाखच भरुन रवाना झाल्या. कारण रात्रभर ऑफिसमध्ये हजारो मुंबईकर अडकून होते. पाण्यात वाहनं बंद पडल्याने, इंधन संपल्याने किंवा वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी आपली वाहनं रस्त्यावरच सोडली होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबई पोलिसांनी सकाळच्या वेळेला आणि रात्रभर टोईंगच्या मदतीने ही वाहनं हटवून वाहतूक सुरळीत केली. दिवसभर मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवर रस्ते वाहतूक सुरळीत सुरु होती. मुंबईतल्या पावसाची आकडेवारी मुंबईतील काल सकाळी 8 ते आज सकाळी 6 वाजेपर्यंतची पावसाची आकडेवारी : शहर - 196 मिमी, पूर्व उपनगर - 220 मिमी, पश्चिम उपनगर - 219 मिमी डबेवाल्यांची सेवा बंद डब्बेवाल्यांची सेवा आज बंद होती. डब्बेवाले रात्रभर विविध स्टेशनवर अडकल्याने आज डब्बे पोहोचण्याची सेवा बंद करण्यात आली. मृत्यू, बेपत्ता या बातम्यांनी मुंबईकर हळहळले मुंबईतील तुफान पावसाने बरंच काही हिरावून घेतलं. या पावसात तडाख्यात कालपासून बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता आहे. तर एका वकिलाचा कार पाण्यात अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर विविध ठिकाणी घरं पडूनही अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये 13 जणांचा मृत्यू मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये कालच्या पावसामुळं 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विक्रोळीमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. तर ठाण्यामध्ये कालपासून 4 जण वाहून गेलेत. याशिवाय कालच्या पावसात नेमके किती बेपत्ता झाले आहेत, याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. दुसरीकडे पालघरमध्ये देखील पावसाने कहर केला असून, आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. डहाणू आणि बोईसर परिसरात मुसळधार पावसात 4 जण वाहून गेले. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू आहे. तर आज सकाळी विनोद दळवी नावाचा तरूण जव्हार परिसरातल्या नाल्यातून वाहून गेला. नरू वळवी नावाचा मुलगा बोटीनं सातपाटी येथे जात असताना बुडाला आहे. स्पिरीट ऑफ मुंबई, मदतीसाठी अनेक हात सरसावले नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपूर्ण मुंबई एकवटली. पावसात अडकलेल्यांना मदत देण्यासाठी ठिकठिकाणी खाण्यापिण्याची, निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर भर पावसात काही तरुण रात्रभर वाहतूक कोंडी सोडवत होते. वाहतूक कोंडी अडकलेल्यांना खाण्यासाठी अन्न आणि पाणी जागेवर नेऊन देत होते. काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग होता : उद्धव ठाकरे 24 तासानंतर पावसानं मुंबईतून एक्झिट घेतल्यानं तुम्ही-आम्ही सुटकेचा श्वास सोडला, पण काल मुंबईवर एक भयानक संकट घोंघावत होतं. ज्याची आपल्याला कल्पनाही केलेली नव्हती. काल (मंगळवार) दुपारच्या सुमारास मुंबईच्या डोक्यावर तब्बल 9 किलोमीटर उंचीचा ढग होता. जो फुटला असता तर मुंबईची परिस्थिती आणखी बिकट झाली असती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी आज (बुधवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही धक्कादाय माहिती उघड केली. दुपारनंतर सूर्यदर्शन मुसळधार पावसानंतर मुंबईकरांना आज सूर्यदर्शन झालं आहे. काल दिवसभर धो धो बरसल्यानंतर पावसाने मुंबईत आज जराशी उसंत घेतली. रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे मुंबईकरांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेक जण काल दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर वाहतूक कोंडीत अडकून होते. अनेकांनी वाहनं जागीच सोडून पर्यायी वाहतूक व्यवस्थेने घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर पाण्यात वाहनं बंद पडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. संबंधित बातम्या :

काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग होता : उद्धव ठाकरे

मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये 13 जणांचा मृत्यू

पाण्यातून चालताना डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये कोसळले?

मुंबईकरांना अखेर सूर्यदर्शन, पावसाची उसंत!

मुंबईचा पाऊस : सायनमध्ये गाडीत गुदमरुन वकिलाचा मृत्यू

पाणी उकळून प्या, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

मुंबईत पावसाची उघडझाप सुरुच, लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही!

मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, सुषमा अंधारेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा व्हिडिओही शेअर
अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, सुषमा अंधारेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा व्हिडिओही शेअर

व्हिडीओ

Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget