एक्स्प्लोर

Mansukh Hiren | क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला, मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती

पोलिसांना भेटायला जातो असं सांगून ते गेले, पण परतलेच नाही. मनसुख हिरेन कधीच आत्महत्या करु शकत नाही. त्यांच्या मृत्यू मागचं सत्य समोर यायला हवं, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली आहे.

ठाणे : कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेह बाहेर काढला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल होते. मनसुख हिरेन हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे खाडीत त्यांचा मृतदेह आढळल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

याविषयी बोलताना विमला हिरेन म्हणाल्या की, "आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. पोलिसांच्या सूचनेनुसार ते वेळोवेळी चौकशीसाठी जात होते. दिवसभर त्यांना तिथे बसवलं जायचं. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कालही त्यांना बोलावलं, ते गेले पण परत आलेच नाहीत. दहा वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. त्यांनी घोडबंदर इथे भेटायला बोलवल्याचं सांगितलं. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद येऊ लागला. आम्ही रात्रभर वाट पाहिली, सकाळपर्यंत न आल्याने आम्ही तक्रारही दाखल केली. पोलीस अधिकाऱ्याला भेटायला जात असल्याचं निघताना सांगितलं. ते कोणत्याही दबावात नव्हते. पोलिसांचा कॉल येत होतो तेव्हा ते जात होतो. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. आज मीडियामध्ये बातम्या आल्या आणि पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी आत्महत्या केली, हे पूर्णत: खोटं आहे. ते आत्महत्या करु शकत नाहीत. ही अफवा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं. आमचं पूर्ण कुटुंब भरडलं जात आहे."

दरम्यान या प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक दावा केला आहे. स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे फोनवरुन संवाद झाल्याचं फडणवीस म्हणाले. तसंच हे प्रकरण एनआयएकडे सोपवावं अशी मागणीही त्यांनी लावून धरली. या मुद्द्यावरुन विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगीही पाहायला मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
VC Janardan Rao : 500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
Embed widget