एक्स्प्लोर

राज्य सरकारकडून केरळसाठी 20 कोटी आणि अन्नाची पाकिटं

विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच राज्य सरकार संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा आणि इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

मुंबई : केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. शिवाय विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच राज्य सरकार संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा आणि इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्राकडूनही तातडीची मदत म्हणून 20 कोटींचं अर्थसहाय्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. राज्य शासन केरळ सरकारशी कालपासून सातत्याने संपर्कात असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. त्यात एका पथकाची नियुक्ती करुन त्यावर याबाबतच्या समन्वय आणि कार्यवाहीची जबाबदारी सोपव‍ण्यात आली आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा ही प्राधान्याची गरज असल्याचं लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्न पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे.

एमसीएचआय – क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किंमतीचे अन्न उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राजस्थानी वेल्फेअर असोसिएशनकडून 51 लाख आणि जितो इंटरनॅशनलकडूनदेखील 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 11 टन अन्न आतापर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलं असून त्यापैकी 6 टन अन्न पुरवठा आज सायंकाळपर्यंत रवाना होणार आहे.

इतर राज्यही सरसावले

महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. हैदराबादमधून अन्नाची पाकीटं सैन्याच्या विमानाद्वारे नेण्यात आली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 कोटी, शिवाय आपचे सर्व आमदार आणि खासदार यांचं एक महिन्याचं वेतन आणि तेलंगणाकडून 25 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

पुरातील मृतांचा आकडा 324 वर

दरम्यान केरळमधील भीषण पुरात 324 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. एकूण 82 हजार लोकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळही अद्याप बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावकार्य सुरु आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget