एक्स्प्लोर

सरकार गेले तरीही मविआ सरकारमधील अनेकांचा सरकारी बंगल्याचा मोह कायम!

अद्याप 13 माजी मंत्र्यांनी आणि एका माजी अधिकाऱ्याने हे बंगले सोडलेले नाहीत. विशेष म्हणजे या रिकाम्या न झालेल्या 14 बंगल्यांमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे

Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Govt) जाऊन शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Sarkar) सरकार स्थापन झालं आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet) कार्यक्रम रखडला आहे. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र तरीही तत्कालीन सरकारमधील अनेक मंत्र्यांनी अद्यापही आपले सरकारी बंगले रिकामे केलेले नाहीत.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या मंत्र्यांच्या एकूण 40 बंगल्यांपैकी फक्त 18 बंगले रिकामे झाले आहेत. 

अद्याप 13 माजी मंत्र्यांनी आणि एका माजी अधिकाऱ्याने हे बंगले सोडलेले नाहीत. विशेष म्हणजे या रिकाम्या न झालेल्या 14 बंगल्यांमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे. नियमानुसार मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधीत हे बंगले रिक्त करावे लागतात. मात्र ठाकरे सरकार पायउतार झाल्यास महिना उलटूनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे 14 बंगले रिकामे झालेले नाहीत.

या नेत्यांनी अद्याप बंगले अजून सोडले नाहीत: 

धनजंय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, दादाजी भुसे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, नाना पटोले (माजी विधानसभा अध्यक्ष), सीताराम कुंटे (माजी अधिकारी)

काही मंत्र्यांनी मात्र सरकार गेल्यानंतर लगेचच बंगले सोडण्याची तयारी केली होती. आणि ठरलेल्या वेळेच्या आधी बंगले रिकामे केले होते. 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून 36 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्यानं बंगल्यांचा प्रश्न तसा उपस्थित झालेला नाही मात्र आता कुठल्याही क्षणी विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता हे माजी मंत्री बंगले खाली कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी वर्षा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलं होतं.

मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता संबंधित विभागांच्या सचिवांना

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार हा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता संबंधित विभागांच्या सचिवांना (Secretary) देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. मंत्र्यांकडे अनेक प्रकारचे अधिकार असतात, पण राज्यात मंत्रीच (Minister) नाहीत. यामुळे विविध विभागांची कामे अडली आहेत. अर्धन्यायिक स्वरुपाची अपीले, पुनर्विलोकन, पुनर्परीक्षण अर्ज तसेच अंतरिम आदेशासाठीचे अर्ज दाखल करणे, अंतरिम आदेश पारित करणे आणि तातडीच्या प्रकरणाची सुनावणी तसंच निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडे असतात. मात्र, आता मंत्रीच नसल्याने हे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव तसंच सचिवांकडे दिले आहेत. 

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal On Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
Sonali Kulkarni : 'एकाच ठिकाणी 5 तासांपासून…', पुण्याला निघाली अन् वाहतूक कोंडीत अडकली सोनाली कुलकर्णी! VIDEO शेअर करत दाखवली भीषण परिस्थिती
'एकाच ठिकाणी 5 तासांपासून…', पुण्याला निघाली अन् वाहतूक कोंडीत अडकली सोनाली कुलकर्णी! VIDEO शेअर करत दाखवली भीषण परिस्थिती
Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
मोठी बातमी: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
Pune Crime News: 'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
Akola Washim Accident: अकोला–वाशिम महामार्गावर कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; 15 महिला जखमी, PHOTO
अकोला–वाशिम महामार्गावर कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; 15 महिला जखमी, PHOTO
Maan Water Crisis: वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, शासनाच्या योजनाही कागदावरच; घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?
वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, शासनाच्या योजनाही कागदावरच; घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?
Embed widget