एक्स्प्लोर

मुंबईत मतदानाचा टक्का घसरण्यामागे षडयंत्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

Mumbai Voting Percentage : मतदानाच्या दिवशी संथगतीने मतदान प्रक्रिया झाली, तर मतदानाच्या ठिकाणी पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या असा आरोप करण्यात येतोय. 

मुंबई : मतदार तर मतदानासाठी बाहेर पडले होते, पण त्यांना चार-चार तास रांगेत ताटकळत राहावं लागलं, त्यामुळे अनेक ठिकाणी मतदार मतदान न करताच परत गेल्याच्या घटना मुंबईत घडल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी संथ गतीने राबवलेल्या प्रक्रियेमुळे मतदानाचा टक्का घसरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. याच मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीच्या मुंबईतील सर्व उमेदवारांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली

मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान संथगतीने झालं. त्यामुळे मतदानाचा टक्कासुद्धा त्यामुळे घसरला. शिवाय अनेक ठिकाणी मतदारांसाठी पाण्यासारख्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या तक्रारी सुद्धा आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात  चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

मुंबईतील मतदान कमी होण्यामागे मोठं षडयंत्र - अंबादास दानवेंचा आरोप

पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे. पिण्याची पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. यामागे मोठं षडयंत्र आहे. तसेच मर्जीतील निवडणूक अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने डाव रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
  
मतदानापूर्वी भाजप आणि गद्दार उमेदवारांनी पैसे वाटप केले. भांडूप मध्ये अशी घटना उघड झाल्यावर राज्याचे गृहमंत्री तेथे पोहचले होते असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी  शाई लावली. राज्याच्या निवडणूक आयोगांबाबत अशी स्थिती असल्यास सामान्य माणसाचे काय झाले असेल, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. 

श्रीकांत देशपांडे यांची बदली का करण्यात आली? 

निवडणुक आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली का करण्यात आली?  सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची भूमिका निवडणूक आयोग व पोलिसांनी घेतली आहे का? याबाबत निःपक्षपातीपणे उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget