एक्स्प्लोर

मी ईडीला घाबरत नाही, मंत्र्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची माझ्यात हिंमत आहे : राज ठाकरे

कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलवले होते. साडेआठ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची तेव्हा चौकशी केली होती.

मुंबई : कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलवले होते. साडेआठ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची तेव्हा चौकशी केली होती. राज ठाकरे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात सातत्याने बोलत असल्यामुळे राज यांच्या पाठी ईडीचा ससेमिरा लावला असल्याची टीका राजकीय स्तरातून होऊ लागली. तसेच ईडीच्या चौकशीनंतर बराच वेळ राज ठाकरे माध्यमांसमोर काही बोलले नव्हते. त्यामुळे ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे बॅकफुटवर गेल्याची टीकादेखील झाली. परंतु या चौकशीनंतर पहिल्यांदाच राज या चौकशीबाबत बोलले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी मुंबईत काल (10 ऑक्टोबर) दोन आणि आज (11 ऑक्टोबर) तीन जंगी सभा घेतल्या. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, सर्व मंत्र्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची माझी हिंमत आहे. ईडीच्या कितीही चौकशा लावल्या तरी मी त्याला घाबरत नाही. काँग्रेस राष्ट्रवादीमधले भ्रष्टाचारी नेते भाजप आणि शिवसेनेत गेले आहेत. त्यांना कोणीच जाब विचारत नाहीत. मात्र माझी ईडीकडून चौकशी केली जाते. अशा चौकशांना राज ठाकरे घाबरत नाही. सरकारला वठणीवर आणण्यासाठी मनसेला मत द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. काल गोरेगाव आणि सांताक्रुझमध्ये सभा घेतल्यानंतर राज ठाकरेंनी भांडुपमधल्या उमेदवारांसाठी सभा घेतली. राज यांनी सांगितले की, मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातले 78 टोल बंद झाले. तर मनसेमुळं मोबाईलमध्ये मराठी भाषा सुरु झाली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात तीन भाषा आहेत. मी चौथी भाषा इथे येऊ देणार नाही, तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याला बांबू बसतील. दरम्यान भाजपच्या काळात राज्य सरकारचं अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं आहे, असा आरोप मनसेने केला. कलम 370 वर बोलणारे अमित शाह शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चकार का काढत नाहीत? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sonali Kulkarni : 'एकाच ठिकाणी 5 तासांपासून…', पुण्याला निघाली अन् वाहतूक कोंडीत अडकली सोनाली कुलकर्णी! VIDEO शेअर करत दाखवली भीषण परिस्थिती
'एकाच ठिकाणी 5 तासांपासून…', पुण्याला निघाली अन् वाहतूक कोंडीत अडकली सोनाली कुलकर्णी! VIDEO शेअर करत दाखवली भीषण परिस्थिती
Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
मोठी बातमी: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
Pune Crime News: 'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
Akola Washim Accident: अकोला–वाशिम महामार्गावर कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; 15 महिला जखमी, PHOTO
अकोला–वाशिम महामार्गावर कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; 15 महिला जखमी, PHOTO
Maan Water Crisis: वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, शासनाच्या योजनाही कागदावरच; घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?
वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, शासनाच्या योजनाही कागदावरच; घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?
May 2026 Monthly Horoscope: पुढच्या 24 तासांत 6 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल! मे महिन्याची जबरदस्त सुरूवात, 12 राशींसाठी कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम...
पुढच्या 24 तासांत 6 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल! मे महिन्याची जबरदस्त सुरूवात, 12 राशींसाठी कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम...
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, वर्षा बंगल्यावर पाऊणतास राजकीय खलबतं, विधानपरिषदेसाठीच्या नावावर शिक्कामोर्तब?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, वर्षा बंगल्यावर पाऊणतास राजकीय खलबतं, विधानपरिषदेसाठीच्या नावावर शिक्कामोर्तब?
Embed widget