एक्स्प्लोर

मुंबईत 9 मार्चपर्यंत जमावबंदी; दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नऊ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार मुंबई पोलीस उपआयुक्तांनी हा आदेश जारी केलाय.

मुंबई : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही आता चांगलीच खबरदारी घेतलीय. कारण बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीत नऊ मार्च 2020 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलीय. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करता येणार नाही. समारंभ किंवा काही कार्यक्रमांना मात्र यामधून सूट देण्यात आलीय. तसंच चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि शासकीय कार्यालयांनाही यातून वगळण्यात आलंय. सीएए समर्थक आणि विरोधक यांच्यात झालेल्या वादातून दिल्लीत हिंसाचाराला सुरुवात झाली. सलग तीन दिवस हा हिंसाचार सुरुच होता. आता दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. या हिंसाचारात आतापर्यंत मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. काल शुक्रवारी राजधानीत तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. हिंसाग्रस्त भागातील स्थिती सुधारत असून जीवनावश्यक वस्तूही मिळत आहेत. परिसरात सात हजार सशस्त्र पोलीस व निमलष्करी जवान तैनात आहेत. परिस्थितीत सुधारणा झाल्याने जमावबंदी आज शिथिल करण्यात आलीय. Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी - सीएए विरोधावरुन दिल्लीप्रमाणे मुंबईतही आंदोलने सुरू आहेत. शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतील भिवंडीतही महिलांचं शांततापूर्ण आंदोलन सरुय. तर, दुसरीकडे सीएए समर्थानासाठीही लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. परिणामी इथंही दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत नऊ मार्चपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त यांनी बृहन्मुंबई हद्दीत जमावबंदीचा आदेश जारी केलाय. Delhi Violence : हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना, 48 एफआयआर दाखल दिल्ली हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना - दिल्ली पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. या प्रकरणांच्या चौकशीसाठी दोन विशेष तपास पथकांची(एसआयटी)स्थापन केली आहेत. पोलीस ठाण्यात 100 पेक्षा अधिक एफआयआर दाखल झाल्या आहेत. पथकांचे नेतृत्व पोलीस उपायुक्त जॉय टिर्की आणि राजेश देव करणार आहेत. या पथकांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचे चार अधिकारी असणार आहेत. या तपासावर अतिरिक्त पोलिस आयुक्त बी.के. सिंह लक्ष ठेवणार आहे. दिल्ली हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 42 झाली असून त्यातील 11 जणांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे. Delhi Violence | सर्वाधिक हिंसाचार झालेल्या करावलनगरमधून ग्राऊंड रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Embed widget