एक्स्प्लोर

उत्तर भारतीयांवर दादागिरी करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली : मुख्यमंत्री फडणवीस

उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुंबई : ज्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीय लोकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही जागा दाखवून दिल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल उत्तर प्रदेश दिवस साजरा झाला, त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. जेव्हापासून भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुख्यमंत्र्यानी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. मुंबई फिल्मसिटीचे उपाध्यक्ष इंद्रजित मिश्रा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय हे भाऊ आहेत. जेव्हापासून आमचं सरकार आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले थांबले आहेत. असे हल्ले करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली आहे, असे फडणवीस म्हणाले. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय  फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते खूप जुने आहे. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय अशीच आहे. ती श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तिचा विस्तार देशभर झाला. मराठे जसे देशभर विखुरले आहेत. तसेच उत्तर भारतीय देशाच्या काना-कोपऱ्यात पोहचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही उत्तर प्रदेशातून आलेल्या गागा भटांनी मोठी भूमिका बजावली होती. उत्तर प्रदेशचे नागरिकही आता महाराष्ट्राच्या संस्कृतीत दुधात साखर विरघळावी तसेच मिसळून गेले आहेत. त्यांच्या तीन-तीन पिढ्या इथल्याच आहेत. त्यामुळे ते आता मुंबईकर होऊन गेले आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्र अग्रेसर  राज्य - योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या वाढीत उत्तर प्रदेशवासियांनीही मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे प्रयत्न आणि पानिपतच्या लढाईतील मराठ्यांचे शौर्य अलौकिकच असे होते. महाराष्ट्राची भूमी संत, थोर राष्ट्रपुरूषांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपला देश सामाजिक समतांचा पुरस्कर्ता आहे. यात महाराष्ट्रातील दूरदृष्टीच्या धुरिणांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूरमधील दीक्षाभूमीचा विकास आणि मुंबईतील यथोचित स्मारक उभारण्याचे महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न गौरवास्पदच असे आहेत. महाराष्ट्र शासन लोकाभिमुखता आणि विकास पथावरील अग्रेसर असे राज्य म्हणून राहण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे मोठे योगदान असल्याचेही योगी यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
Embed widget