एक्स्प्लोर

उत्तर भारतीयांवर दादागिरी करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली : मुख्यमंत्री फडणवीस

उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुंबई : ज्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीय लोकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही जागा दाखवून दिल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल उत्तर प्रदेश दिवस साजरा झाला, त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. जेव्हापासून भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुख्यमंत्र्यानी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. मुंबई फिल्मसिटीचे उपाध्यक्ष इंद्रजित मिश्रा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय हे भाऊ आहेत. जेव्हापासून आमचं सरकार आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले थांबले आहेत. असे हल्ले करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली आहे, असे फडणवीस म्हणाले. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय  फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते खूप जुने आहे. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय अशीच आहे. ती श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तिचा विस्तार देशभर झाला. मराठे जसे देशभर विखुरले आहेत. तसेच उत्तर भारतीय देशाच्या काना-कोपऱ्यात पोहचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही उत्तर प्रदेशातून आलेल्या गागा भटांनी मोठी भूमिका बजावली होती. उत्तर प्रदेशचे नागरिकही आता महाराष्ट्राच्या संस्कृतीत दुधात साखर विरघळावी तसेच मिसळून गेले आहेत. त्यांच्या तीन-तीन पिढ्या इथल्याच आहेत. त्यामुळे ते आता मुंबईकर होऊन गेले आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्र अग्रेसर  राज्य - योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या वाढीत उत्तर प्रदेशवासियांनीही मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे प्रयत्न आणि पानिपतच्या लढाईतील मराठ्यांचे शौर्य अलौकिकच असे होते. महाराष्ट्राची भूमी संत, थोर राष्ट्रपुरूषांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपला देश सामाजिक समतांचा पुरस्कर्ता आहे. यात महाराष्ट्रातील दूरदृष्टीच्या धुरिणांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूरमधील दीक्षाभूमीचा विकास आणि मुंबईतील यथोचित स्मारक उभारण्याचे महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न गौरवास्पदच असे आहेत. महाराष्ट्र शासन लोकाभिमुखता आणि विकास पथावरील अग्रेसर असे राज्य म्हणून राहण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे मोठे योगदान असल्याचेही योगी यांनी नमूद केले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sheetal Mhatre On Ashok Kharat Case मोठी बातमी: मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरातला पाण्याची जोडणी, शिंदेसेनेचा गंभीर आरोप!
मोठी बातमी: मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरातला पाण्याची जोडणी, शिंदेसेनेचा गंभीर आरोप!
Aaditya Thackeray: पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत खासदारांच्या बैठकीत खासदारांची थेट तक्रार, बैठकीत काय काय घडलं?
पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत खासदारांच्या बैठकीत खासदारांची थेट तक्रार, बैठकीत काय काय घडलं?
Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय काय म्हणाल्या?
I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय म्हणाल्या?
धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय काय म्हणाल्या?
I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय म्हणाल्या?
Rajiv Gandhi Zoological Park : पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
Dr. Jaysingrao Pawar : आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
डॉ. जयसिंगराव पवार: आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
Bhide Guruji on Ashok Kharat: अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती
अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती
Ashok Kharat: भोंदू खरातचे 'गन कनेक्शन' उघड! जिल्हा प्रशासनानेच दिला होता शस्त्र परवाना; 21 काडतुसे जप्त, 5 काडतुसे वापरली, मोठी माहिती समोर
भोंदू खरातचे 'गन कनेक्शन' उघड! जिल्हा प्रशासनानेच दिला होता शस्त्र परवाना; 21 काडतुसे जप्त, 5 काडतुसे वापरली, मोठी माहिती समोर
Dhurandhar 2 Mistake Goes Viral: 'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
Ashok Kharat: हे मंदिरच इथे ठेवू नका, हे पाडून टाका, यामध्ये नकारात्मक ऊर्जा ; खरातची विकृत खेळी, पुरातन शिवमंदिर पाडण्याचा डाव, एका ॲपचा वापर करत म्हणाला....
हे मंदिरच इथे ठेवू नका, हे पाडून टाका, यामध्ये नकारात्मक ऊर्जा ; खरातची विकृत खेळी, पुरातन शिवमंदिर पाडण्याचा डाव, एका ॲपचा वापर करत म्हणाला....
Embed widget