एक्स्प्लोर

विमानतळ क्षेत्रातील इमारतींना मोठा दिलासा, आता 55 मीटर उंचीच्या जागी 160 मीटर पर्यंत मिळणार परवानगी

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलो मिटरपर्यंत येणाऱ्या प्रभावित क्षेत्रातील इमारतींच्या बांधकामांना आता दिलासा मिळाला आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलो मिटरपर्यंत येणाऱ्या प्रभावित क्षेत्रातील इमारतींच्या बांधकामांना आता दिलासा मिळाला आहे. प्रभावित क्षेत्रातील इमारतींच्या उंचीला या आधी 55 मीटरची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ही अट रद्द करून 55 मीटर ते 160 मीटर पर्यंत उंच इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानतळ क्षेत्रातील इमारतींच्या विकासाला गती मिळणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रातील इमारतींच्या उंचीवरील मर्यादा संदर्भातील तांत्रिक अडचणींची समाधानकारक सोडवणूक करण्याकरिता नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या क्षेत्रातील इमारतींच्या बांधकामांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे विमानतळ प्रकल्पाच्या कामासही गती लाभणार आहे. तसेच विमानतळ प्रकल्प हा संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाकरिता योगदान देणारा ठरणार आहे. 

भारत सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, विमानतळ भोवतालच्या 20 किलोमीटर क्षेत्रातील इमारतींना स्थानिक नगर नियोजन प्राधिकरणांकडून बांधकाम परवाना प्राप्त करण्यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून इमारतीच्या उंची संदर्भातील वैध ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले आहे. फेब्रवारी 2020 पासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भोवतालच्या 20 किलोमीटर क्षेत्रातील कोणत्याही बांधकाम प्रकल्पांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता केवळ 55.10 मीटर एएमएसएल उंचीची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. येथील हवाई क्षेत्रातील संभाव्य अडथळे टाळण्याकरिता उंचीची सदर मर्यादा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात आली होती.

यामुळे मागील दोन वर्षांपासून विमानतळ प्रभावित क्षेत्रातील नियोजित / पूर्ण झालेल्या / प्रगतीपथावर असलेल्या निवासी तसेच वाणिज्यिक बांधकाम प्रकल्पांना स्थानिक प्राधिकरणांकडून बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यात विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना अडचणी येत होत्या. याकरिता प्रकल्पबाधित, विकासक, बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य जनता, अशा विविध घटकांकडून इमारतींच्या उंचीबाबतची अट शिथिल करण्यासंदर्भात सिडकोला विनंती करण्यात आली होती.

22 जुलै 2022 रोजी भारत सरकारचे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सिडको, एनएमआयएएल आणि आयई-एईसीकॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत संयुक्तरीत्या हा निर्णय घेण्यात आला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून साधारणत: ऑगस्ट 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी याकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सिडकोचे एम डी डॅा. संजय मुखर्जी यांनी केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप
Maharashtra Politics: 'एकट्या NCP-Shiv Sena वर अवलंबून नाही', Congress नेते Harshwardhan Sapkal यांचे स्वबळाचे संकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Embed widget