एक्स्प्लोर

परंपरा खंडीत करणारा लॉकडाऊन, नारळी पौर्णिमेआधीच जीव धोक्यात टाकत मासेमारीला सुरुवात

चार महिन्यापासून कोरोनामुळे घरात बसून असल्यामुळे त्यांना घर चालवणं अवघड झालं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक बंदरांवर छोट्या छोट्या बोटी मासेमारीसाठी खवळलेल्या समुद्रात जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मुंबई : उद्या नारळी पौर्णिमा आहे. परंपरेप्रमाणे नारळी पौर्णिमेपासून कोळीबांधव मासेमारी सुरु करतात. मात्र यंदा कोरोना लॉकडाऊनमुळं पौर्णिमेच्या बरेच दिवस आधीपासून कोळी बांधव आपला जीव धोक्यात घालून मच्छीमारीसाठी समुद्रात जात आहेत. गेल्या चार महिन्यापासून कोरोनामुळे घरात बसून असल्यामुळे त्यांना घर चालवणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक बंदरांवर छोट्या छोट्या बोटी मासेमारीसाठी खवळलेल्या समुद्रात जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमधील अनेक मच्छी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात माशांची आवक झाल्याचे दिसून येत आहे. तसेच हे मासे खरेदी करण्यासाठी ग्राहकही गर्दी करताना दिसत आहेत. बाजारात मच्छी येण्यासाठी अजून नारळी पौर्णिमेचा अवधी आहे. मात्र तरीही मुंबई आणि उपनगरातील काही मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासे विक्रीसाठी येऊ लागले आहेत. पावसाळ्यात आणि नारळी पौर्णिमा अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारात ही मासोळी आली कशी? याला कारण आहे कोरोना. चार महिने उपासमार झाल्यानंतर आता कोणताच पर्याय नसल्यामुळे कोळी बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून समुद्रात आपल्या बोटी नेल्या आणि आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी मासे पकडून आणली जात आहे. पावसाळ्यात समुद्राला उधाण येतं, वादळीवाऱ्यामुळं आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्र खवळलेला असतो. यावेळी कोळी बांधव आपली नौका समुद्रात घालत नाहीत. नारळी पौर्णिमा आली की कोळी समाज्यातील सर्वच नागरिक समुद्रावर जाऊन समुद्रदेवतेला नारळ वाहून समुद्र शांत ठेवण्याची प्रार्थना करतात आणि वर्षभर माशांच्या रूपाने भरभराट होण्याची प्रार्थना करतात. ही परंपरा वर्षोनुवर्षे सुरू आहे. मात्र या परंपरेला यावर्षी खंड पडला आहे. कोरोनामुळे गेल्या 4 महिन्यापासून घरात बसून रहावं लागलं, या कालावधीत कोळी समाजाला मासेमारी करता न आल्यामुळे सध्या घर चालवणं मुश्किल झालं आहे. कोणताच पर्याय नसल्यामुळे अनेक कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेअगोदरच आपल्या उपजीविकेसाठी खवळलेल्या समुद्रात आपल्या बोटी घातल्या आहेत. त्यातून मिळणाऱ्या मच्छीची विक्री करून ते आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. काय आहे परंपरा
  • कोळी बांधव 12 महिन्यांपैकी 9 महिने समुद्रात मासेमारी करतात
  • पावसाळ्यातील 3 महिने समुद्राला उधाण असल्यामुळे समुद्रात जात नाहीत
  • जून ते ऑगस्ट हे तीन महिने समुद्रातील छोट्या माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतात
  • या तीन महिन्यात बोटींची डागडुजी करणं, झाळ्याची बांधणी करणं, अशी कामे सुरू असतात
  • नारळी पौर्णिमेनंतर पारंपरिक पद्धतीनं समुद्र देवतेची पूजा करून कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात
कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही कोरोनामुळे सुरवातीला ग्राहक मासे खरेदी करत नव्हता. व्यापारी माल घेत नव्हते, त्यामुळे सुरवातीला मासे फेकून देण्याची वेळ आली होती. मंदी आणि कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत बोटींसाठी डिझेल, खलाशांसाठी  व्यवस्था न करता आल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला. गेल्या 3 महिन्यात अनेक कोळी वाड्यामध्ये नेते आणि सरकारी अधिकारी पोहोचले नाहीत. कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. कोरोनाचा सर्वच घटकांना मोठा फटका बसलेला आहे. अशा सर्व घटकांना पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज ही जाहीर केलेलं आहे. मात्र या पॅकेजमधील एक दमडी सुद्धा कोळी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचलेली नाही हे वास्तव आहे. यापूर्वी पावसाळ्यात मासेमारीसाठी अनेक आधुनिक तंत्राच्या मोठ्या बोटी दिसत होत्या. मात्र आता कोळी बांधवांकडे कुठलाच पर्याय नसल्यामुळे छोट्या छोट्या बोटी देखील मासेमारी साठी समुद्रात फेरफटका मारताना दिसत आहेत. कोरोनामुळे राज्यातील सर्वच सण, समारंभ, उत्सव रद्द झालेले आहेत. अनेक रुढी परंपरेने चालत आलेल्या गोष्टी यावेळी थांबवण्यात आलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणजे नारळी पौर्णिमे आधीच होत असलेली मासेमारी असंच आपल्याला म्हणावे लागेल. कोरोनाच्या काळात कोळी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत. आधीच तग धरू न शकलेला हा व्यवसाय आता पूर्णपणे डबघाईला गेलेला आहे. शासनाने आमच्यासाठी मोठे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केलीये. मात्र त्या पॅकेजमधील एक दमडीही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. नारळी पौर्णिमा यायच्या अगोदरच कोळी बांधव समुद्राच्या दिशेने मासेमारीसाठी जात आहेत. पण याला कारणीभूत कोरोना बरोबरच शासन सुद्धा आहे. त्यांनी जर या पडत्या काळात कोळी समाजाला मदत केली असती तर ही परिस्थिती कोळी समाजावर उद्भवली नसती, असं जयेश आकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र मच्छीमार सेल अध्यक्ष ऍड. चेतन पाटील सांगतात की, गेल्या वर्ष सव्वा-वर्षापासून नैसर्गिक वादळामुळे आणि आपत्तीमध्ये सापडल्याने नंतर कोरोनाचं सावट आल्यामुळे त्यांच्यावरती देखील उपासमारीची वेळ आली आहे. यासाठीच आम्ही वारंवार मागच्या 2019 ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही सरकारला मत्सव्यवसाय दुष्काळ घोषित करा, अशी विनंती करून सुद्धा वारंवार निवेदन ही दिलेला आहे. परंतु सरकार ह्यावर लक्ष देत नाहीये. कोरोना काळामध्ये फिशिंगचा समर सिझन असतो. यामध्ये सुद्धा कोळी बांधव जाऊ शकले नाही.त्यामुळे वर्षभर उपासमारी आणि हालाखीचे दिवस आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने जर मच्छीमारांना सांभाळून घेतलं असतं तर मच्छीमार बंदीच्या कालावधीमध्ये फिशिंगला जायची वेळ आली नसती. याला सर्व कारणीभूत आणि जबाबदार हे महाराष्ट्राचे विद्यमान सरकार आहे, असं पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, राज्य सरकारला प्रतिदिन 5 रुपये, राईडच्या 2 टक्के रक्कम द्यावी लागणार : प्रताप सरनाईक
मोठी बातमी,बाईक टॅक्सी चालकांना डोमिसाईल अनिवार्य, प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Embed widget