एक्स्प्लोर

लॉकडाऊन 2 : विनाटायरच्या सायकलवरुन तरुण दिल्लीच्या दिशेने; 1500 किलोमीटरचा खडतर प्रवास

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी एका तरुणाने चक्क सायकलवरुन प्रवास सुरू केलाय. तब्बल 1500 किलोमीटरचा प्रवास हा तरुण सायकलवरुन करणार आहे. 80 किलोमीटरच्या प्रवासनंतर त्याच्या सायकलचा टायर फुटला. मात्र, काहीच व्यवस्था नसल्याने तो तशाच सायकलवरुन जात होता.

पालघर : लॉकडाऊनमुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत परराज्यातील कामगार आपल्या गावी जात असल्याचं दिसून आलं आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील कुडूस या गावात निदर्शनास आली. चक्क टायर नसलेल्या सायकलवरून एक युवक मनोरच्या दिशेने निघालेल्या काही ग्रामस्थांना दिसला. विचारपूस केली असता तो दिल्ली येथील आपल्या गावी जात असल्याचे त्याने सांगितले. मुंबईसह उपनगरातील भागात हजोरांच्या संख्येने परप्रांतीय अडकले आहेत. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपेल या आशेवर ते दिवस काढत होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने येथील कामगारांचा संयम तुटत चालला आहे. परिणामी घरी जाण्यासाठी आता ते वेगवगेळे मार्ग अवलंबवताना दिसत आहेत.

नवी मुंबई कोपर खैरणे येथून सोमवारी सकाळी सात वाजता सायकलवरून तो युवक दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाला होता. सकाळी अकराच्या सुमारास तो कुडूस येथून जात असताना त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. नवी मुंबई येथील कपिल हेयर सलून येथे काम करणारा तो युवक सकाळी सात वाजता अडगळीस पडलेली मित्राची सायकल घेऊन निघाला होता. दरम्यानच्या 80 किलोमीटरच्या प्रवासातच त्याच्या सायकलचे पुढचे टायर फुटले व प्रवासादरम्यान ते जीर्ण होऊन निघून पडले. कोपर खैरणे ते दिल्ली हा 1500 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यासाठी निघालेल्या त्या युवकाला कुडूस येथील कइस पटेल, रुकसाद शेख व स्वप्नील जाधव या युवकांनी थांबवले. उपाशीपोटीच निघालेल्या त्या युवकाला खाण्यापिण्यासाठी दिले. गावातीलच एका सायकल दुकानदाराकडून स्वखर्चाने ट्यूब व टायर बसवून दिले.

Coronavirus | राज्यात आज 170 नवे कोरोना बाधित; रुग्णांची संख्या वाढून 2801 वर

प्रप्रांतिय कामगारांचा संयम सुटतोय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशात जाहीर झाला. अचाकन लॉकडाऊन जाहीर झाल्याने हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले आहेत. या कामगारांची सोय आम्ही करू असं प्रत्येक राज्य सरकार सांगत आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोनतीन दिवसात दिल्ली, राजस्थान, गुजराज, महाराष्ट्र, तेलंगाणा या राज्यांच्या सीमाभागात हजारो कामगार घरी जाण्यासाठी जमा झालेले दिसले. प्रशासनाने यावर कसेतरी नियंत्रण मिळवण्यात यश आले. हळूहळू दिवस जात होते. 14 दिवसांनंतर लॉकडाऊन संपेल आणि आपण घरी जाऊ या एकाच आशेवर अनेक कामगार धीर धरुन होते. परंतु, लॉकडाऊन पुन्हा तीन मे पर्यंत वाढवल्यामुळे या कामगारांचा संयम सुटत चालला असल्याचे बोलले जात आहे.

Curfew In Malegaon | मालेगावमध्ये संचारबंदी लागू, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Embed widget