एक्स्प्लोर

मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या मागणीमागे राजकीय हेतू- विजय वडेट्टीवार

महाविकास आघाडी सरकारने  भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला.  परंतु काही जणांचा दबाव आहे त्यामुळे भरती होऊ शकली नाही . मात्र मी त्यासाठी कोणाचेही नाव घेणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले.

इतर मागास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात  ओबीसी , व्ही जे एन टी जनमोर्चाची संवाद परिषद पार पडली.  या परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी एम पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी ज्या संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा अशी मागणी करतायत त्या राजकीय दृष्टीने प्रेरित आहेत असा आरोप केला .

'महाविकास आघाडी सरकारने  भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला.  परंतु काही जणांचा दबाव आहे त्यामुळे भरती होऊ शकली नाही . मात्र मी त्यासाठी कोणाचेही नाव घेणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढेही महाराष्ट्राची वाटचाल त्याच दिशेने व्हायला हवी', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटना वडेट्टीवार यांच्यावर ते समाजा-समाजांमधे भांडणं लावण्याच काम करत असल्याचा आरोप करत असताना  महाराष्ट्राची सामाजिक विण उसवण्याच काम आम्ही करत नाहिये, तर आमच्यावर आरोप करणारे करतायत असा दावा वडेट्टीवार यांनी केला.  जे आमच्यावर  आरोप करतायत त्यांनी इतिहास वाचावा असंही वडेट्टीवार म्हणाले. या परिषदेत राज्यातील भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आणि ज्यांची निवड झालीय त्यांचा नियुक्त्या लवकरात लवकर  करण्याची मागणी करण्यात आली.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं . मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे . 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे.  त्यानंतर राज्यातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल  आणि एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये याचा पुनरुच्चार केला. आम्ही मराठा  समाजाच्या विरोधात आहोत असं खोटं पसरवलं जात असल्याच वडेट्टीवार म्हणालेत.

छगन भुजबळांनी वाहतूक कोंडी सोडवत वाहनांना 'विना टोल' दिली वाट

''विजय वडेट्टीवार हूं मै''

परिषदेत भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की " काही म्हणतील की विजय वडेट्टीवार मंत्री असुन या परिषदेला कसे गेले... पण यारों का यार हू मै.... विजय वडेट्टीवार हूं मै.

काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी बैठक लाऊन घेतली. अर्धा डझन मंत्री त्याला उपस्थित होते. चारशेहुन अधिक विद्यार्थी जे परिक्षा पास झालेत त्यांचा विषय माझ्या डोक्यात घुसलाय. मी लाऊन धरलाय.  माझ्या राजीनाम्याची मागणी करतायत.  परंतु ओ बी सी च्या हक्कासाठी मला काही होत असेल तर हरकत नाही असही वडेट्टीवार म्हणाले.

तारीख पे तारीख नाही... मी तारीख सांगणार नाही.. पण मी केल्याशिवाय राहणार नाही.

मी राज्याचा मंत्री जरी असलो तरी तुमच्या पाठीमागे उभा राहणं हे माझं मानुसकीच्या नात्याने माझं कर्तव्य आहे असही सांगायला वडेट्टीवार विसरले नाहीत. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धीर दिला. तुम्ही निराश होऊ नका डोळ्यांमध्ये अश्रू आणू नका मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी या मुलांना आश्वस्त केलं. राज्य सरकारने मराठा समाजातील तरुणांना ही डब्ल्यू एस च्या  माध्यमातून लागू केलेलं आरक्षण हे तज्ञांची मतं लक्षात घेऊनच केलेला आहे असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांच्या या दाव्यांवर मराठा संघटनांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget