एक्स्प्लोर

Unseasonal rain | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा; ज्वारी, हरभरा, गव्हाचं मोठं नुकसान

राज्यात रविवारी अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. अशातच आज पुन्हा मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभ राहिलंय.

मुंबई :  ज्वारी, हरभऱ्याचं पीक काही ठिकाणी अगदी पोटऱ्यात असताना, तर कुठं खळं सुरू असतानाच अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं ज्वारीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीठही झालीय. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलंय. परभणी जिल्ह्यात आज सकाळी विजांच्या कडकडाटासह सर्वत्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पाऊस जोरदार पडला नसला तरी वाऱ्यामुळे फळबागांचं नुकसान झाल्याची माहिती मिळतीय. तर, लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसाने गहू, हरभरा आणि आंब्याचं नुकसान झालं आहे. पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचप्रमाणे बाजरात आणलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. तातडीनं पंचनामे करण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश - बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. या नुकसान भरपाई नुकसानीची पाहणी करून त्याबाबत मदतीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर, नगर जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर वर्ध्यातील 46 हजार शेतकऱ्यांना लाभ बाजार समीतीतील तूर, हरभरा भिजला - सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अवकाळी पावसामुळे सुमारे 8 ते 10 हजार तूर आणि हरभऱ्याची पोती भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे. सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेली तूर आणि भरभऱ्याची हजारो पोती भिजली. काल रविवार असल्याने बाजर समितीत लिलाव बंद होता. त्यामुळे कोणत्याही आडत दुकानात हमालही उपस्थित नव्हते. अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. मात्र, अवकाळी पावसामुळे बाजारात आणलेल्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुलाकडून शाळेत 'बळीराजा नको करु आत्महत्या' कविता सादर, त्याच रात्री पित्याची आत्महत्या राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका - रविवारी राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात अकोला आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस झाला. वाशिममधल्या शेलू बाजार परिसरात सरी कोसळल्या. ऐन रब्बी हंगामाच्या पीक काढणीवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं पिकाला मोठा धोका निर्माण झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातही धुंवाधार पाऊस झाला. परिणामी येथील गहू आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या हृदयात धडकी भरलीय. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीठही झालीय. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावलीय. गडहिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळं आंबा, काजूच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. Nonseasonal Rain | मनमाडमध्ये काही भागत गारपीट, कांदा, हरभरा आणि ज्वारीचं नुकसान
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget