एक्स्प्लोर

Coronavirus | देवस्थानांनाही कोरोनाचा धसका; अनेक मंदिरं दर्शनासाठी बंद, वणी गडावरचा चैत्रोत्सवही रद्द

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत सप्तश्रृंग गडावरील चैत्र पौर्णिमेचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तर मुंबईतील सिद्धिविनायक, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर, पालीतील बल्लाळेश्वर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा धसका राज्यातील देवस्थानांनीही घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत तुळजाभवानी देवीचं दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या वणी गडावरचा चैत्रोत्सवही रद्द करण्यात आला आहे तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अन्नछत्रही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही पुढील काही दिवस बंद राहणार आहे. मात्र सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून देण्यात येणारं वैद्यकीय मदत केंद्र सुरु राहणार आहे.

सप्तश्रृंग गडावरील चैत्र पौर्णिमेचा उत्सव रद्द

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील यंदाचा चैत्र पौर्णिमेचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणच्या मोठ्या यात्रा, उत्सव खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आल्या आहेत. चैत्र पोर्णिमेची यात्रा ही खान्देशवासियांसाठी खूपच महत्वाची असते. त्यामुळे कसमा पट्ट्यासह खान्देशमधील भाविक तळपत्या उन्हात देवीच्या दर्शनाला पायी जात असतात. केवळ खान्देशच नाही, तर गुजरातमधील भाविक या काळात गडावर येत असल्याने मोठी गर्दी होते. मात्र कोरानेच प्रदुर्भाव लक्षात घेता आज गडावर देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत,प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंदा देवीचा चैत्रोत्सव साजरा न करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने विविध पावलं उचलली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील दर्शन 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिरातले सगळे विधी बंद असणार आहेत. गर्दी करु नका असे आदेश देवूनही भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अन्नछत्र बंद

गर्दी टाळण्यासाठी विठुरायाचे अन्नछत्र बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्याऐवजी भाविकांना फूड पॅकेट दिली जाणार आहेत. विठ्ठल मंदिराच्या अन्नछत्रात रोज दीड ते दोन हजार पंगतीने भाविक भोजनास बसत असतात. अशावेळी कोरोनाचा धोका वाढत असल्याने मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे विठ्ठल मंदिर मोकळे पडले आहे. दर्शन रांग मोकळी पडल्याने आज भाविक थेट पाच मिनिटात देवाच्या पायापाशी पोहचत आहेत.

पालीतील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्चपर्यंत बंद

रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी रात्री 8.30 वाजता बल्लाळेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच इतक्या कालावधीपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला आहे. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बल्लाळेश्वर मंदिरासह महड वरदविनायक मंदिर भाविकांना प्रवेशासाठी बंद केलं आहे.

संबंधित बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission: राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
Kim Jong Un Viral Video: DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission: राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
Kim Jong Un Viral Video: DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
DNA चोरीची भीती? कोणी उचलला ग्लास, कोणी खुर्ची पुसली...; पुतीन भेटीनंतर किम जोंग उनच्या स्टाफकडून सर्व पुरावे नष्ट, Video Viral
Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
लालबागचा राजा 22 तासांनी विसर्जनासाठी पोहोचला, गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
Horoscope Today 7 September 2025: आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
आजचे चंद्रग्रहण 'या' 6 राशींसाठी भाग्याचे! खंडोबारायांची मोठी कृपा, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट; कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी
Bihar Election : बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
बिहारच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या एंट्रीने तुल्यबळ लढतीची शक्यता, पुण्याच्या संस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट
Embed widget