एक्स्प्लोर

तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्ष टिकेल : शरद पवार

शरद पवार हे गुरुवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते विविध ठिकाणी बांधावर गेले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, तिन्ही पक्षांच्या एकत्रित सरकार मध्ये मुख्यमंत्री कोण राहील? या प्रश्नाला बगल देत पवारांनी सध्या चर्चा प्राथमिक स्तरावर असून कोणाची मागणी आल्यास त्याचा विचार करू, सर्व पत्ते आम्ही आजच का खुले करावे.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पूर्ण 5 वर्ष चालेल. तसेच तिन्ही पक्षाचे हे सरकार 5 वर्ष चालावे यावर आमची नजर राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मध्यावधी निवडणुकांची शंका ही त्यांनी फेटाळून लावली. शरद पवार हे गुरुवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते विविध ठिकाणी बांधावर गेले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, तिन्ही पक्षांच्या एकत्रित सरकार मध्ये मुख्यमंत्री कोण राहील? या प्रश्नाला बगल देत पवारांनी सध्या चर्चा प्राथमिक स्तरावर असून कोणाची मागणी आल्यास त्याचा विचार करू, सर्व पत्ते आम्ही आजच का खुले करावे. सध्या आमची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये कोणत्या वेळी कोणता मुद्दा घ्यायचा हे आम्ही निश्चित करू असे उत्तर त्यांनी दिले. शिवसेनेच्या कडवट हिंदुत्व संदर्भातल्या प्रश्नावर शरद पवारानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासाठी धर्मनिरपेक्षता नेहमीच महत्त्वाची असून सरकार चालवताना आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता हा महत्वाचा मुद्दा असेल असे उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे या प्रश्नावर स्पष्ट नकार देत पवार म्हणाले, आमची चर्चा फक्त काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे. राज्यात भाजपशिवाय दुसरे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मात्र पवारांनी खोचकपणे उत्तर दिले. पवार म्हणाले की, बरं झाले त्यांनी ( फडणवीस ) हे सांगितले नाही तर माझ्या डोक्यात फडणवीसांचे 'मी पुन्हा येईन' हेच एकमेव विधान होते. फडणवीसांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मात्र, ते भविष्य ही चांगले ओळखतात हे माहीत नव्हतं. Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस ज्योतिषी होते हे माहित नव्हतं, मी पुन्हा येईन वरुन पवारांचा टोला | ABP Majha   नितीन गडकरी यांच्या राजकारण आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे या विधानाचा समाचार पवार यांनी त्यांच्या खास शैलीत घेतला. मी क्रिकेटमध्ये खेळाडू नव्हे तर प्रशासक आहे असे पवार म्हणाले. मात्र, त्याच प्रश्नावर पुढे बोलताना पवारांनी महाराष्ट्रात स्थिर, विकासाभिमुख सरकार देण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व काही करण्याची आमची सर्वांची मनापासूनची इच्छा असल्याचे सूचक वक्तव्य पवारांनी केले. मुस्लिम आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात तिन्ही पक्षांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम मध्ये निर्णय होईल. एकदा ते तयार झाले तेव्हाच पुढचा मार्ग निश्चित होईल असे पवार म्हणाले. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासन किमान 33 टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरच नुकसानीचे पंचनामे करत आहे, हे चूक असून प्रशासनाने सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना या वर्षी झालेल्या नुकसानी संदर्भात आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना या पुढे बिनव्याजी किंवा अत्यल्प व्याजावर कर्ज देणे शक्य होईल का? या संदर्भात केंद्रीय कृषी विभाग आणि अर्थ विभागाशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीच्या प्रश्नावर गरज पडल्यास पंतप्रधानांची भेट घेऊ असेही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget