एक्स्प्लोर

विलिनीकरणाचं सोडाच... आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर नाहीत, 'डंके की चोट पर' न्याय मिळवून देण्याची घोषणा करणारे पडळकर-सदाभाऊ- सदावर्ते कुठे आहेत? 

ST Strike: मविआ सरकारमुळे एसटी कर्मचारी आत्महत्या करतात असं सांगणारे अॅड. सदावर्ते, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मवाळ भूमिका घेताना दिसतात. 

मुंबई: सरकार कोणचंही असो.... एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, कदाचित सरकारच्या मते हा प्रश्न गौण असल्यानेच त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असावं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटीच्या विलिनीकरणासाठी संप करण्यात आला, त्यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) , सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी त्यासाठी रान उठवलं. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तर हे नेते कुठेच दिसत नाहीत. विलिनीकरणाचं तर सोडाच.... एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही आता वेळेवर होत नाही. मग त्यावेळी 'डंके के चोट पर' न्याय मिळवून देण्याच्या बाता करणारे एसटी कर्मचाऱ्यांचे 'पुढारी' आता कुठे आहेत असा सवाल उपस्थित होतोय. 

एकेकाळी एसटीच्या विलिनीकरणासाठी संप करणारे कर्मचारी आता फक्त महिन्याचा पगार तरी वेळेवर व्हावा यासाठी झगडताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्याची 16 तारीख उलटून गेले तरी जानेवारीचा पगार झालेला नाही. यावर एसटी कर्मचाऱ्यांचा असंतोष लक्षात घेता त्यांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यसरकारकडून कर्मचाऱ्यांना केवळ बेसिक पगार देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, त्यांना पूर्ण वेतन मिळणार नाही. 

पडळकर-सदाभाऊ आणि सदावर्ते कुठे गेले? 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना 29 ऑक्टोबर 2021 रोजी, एसटीचे विलिनीकरण करण्यात यावं यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यानंतर या संपात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उतरले. सोबतीला अॅड. गुणरत्न सदावर्तेंनीही या संपकरी कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र घेऊन या संपात उडी घेतली. 

राज्य सरकारने एसटी संपकऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केली. एसटीसाठी एक महामंडळ असून त्याचं विलिनीकरण केल्यास इतर महामंडळाकडूनही तशी मागणी पुढे येऊ शकते, आणि वस्तुस्थिती लक्षात घेता विलिनीकरणाचा मागणी मान्य होणंही शक्य नव्हतं. त्यानंतर हा संप जवळपास साडेपाच महिने चालला.

संपाच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर हल्लाबोल

एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करत असताना दुसरीकडे या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलं. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला. 

Gopichand Padalkar: काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर? 

काही अधिकारी, कर्मचारी आणि नेत्यांमुळे एसटीमध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय असा आरोप करत गोपीचंद पडळकरांनी याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पडळकरांनी आझाद मैदानातच ठिय्या मांडला. इतकंच काय त्या ठिकाणी रात्रही काढली. 

Sadabhau Khot: विलिनीकरणासाठी, स्मशानात जा, भुतांशी चर्चा करा: सदाभाऊ खोत

तुम्ही तिकडं बदाम, काजू खाताय आणि तुमचं जमलं की एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावेळचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाशी चर्चा करायची असा सवाल विचारला होता. त्यावर एसटी विलिनीकरणासाठी स्मशानात जा, भुतांशी चर्चा करा, पण विलिनीकरण कराच असं सदाभाऊ यांनी ठणकावलं होतं. 

Gunratna Sadavarte: डंके की चोट पर... संपकऱ्यांना न्याय मिळवून देणार; अॅड. सदावर्तेंची प्रतिज्ञा

संपकाळात काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या अवस्थेला मविआ सरकार जबाबदार असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. एसटीचं विलिनीकरण होत नाही यामागे शरद पवारांचा हात आहे, त्यांना आम्ही झुकवणारच असंही ते म्हणाले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ते एसटी संपकऱ्यांना उघड्यावर सोडणार नाही असंही त्यांनी म्हटले होते. 

संपकाळात शरद पवारांच्या घरावर हल्ला

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची मुख्य मागणी सोडली तर बहुतांश मागण्या त्यावेळच्या सरकारने मान्य केल्या होत्या. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं आणि त्यांच्या मुंबईतील घरावर हल्लाही करण्यात आला. या हल्ल्यानंतर 118 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. 

पडळकर, सदाभाऊ आणि सदावर्ते आता मवाळ झाले का? 

मविआ सरकार सत्तेत असताना विलिनीकरणासाठी आक्रमक भूमिका घेणारे हे संपकऱ्यांचे हे तीन नेते शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र मवाळ झाल्याचं दिसून येतंय. या तीनही नेत्यांपैकी एकटाही एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून येत नसल्याची परिस्थिती आहे. 

मविआच्या काळात सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप तब्बल साडेपाच महिन्यानंतर मिटला. या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे हाल तर झालेच पण त्याचसोबत राज्यातील नागरिकांचे अतोनात हाल झाले. आज राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं तरी एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती काही वेगळी नाही. संप काळात कर्मचाऱ्यांना किमान पगार तरी मिळायचा, आज तोही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याने मार सहन करावं लागतोय. 

 

 

 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Ashok Kharat Crime News: भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा, जमीन खरेदीसाठी चक्क नॅशनलाईज बँकेचा वापर, आर्थिक व्यवहारातील भागीदारही SIT च्या रडारवर
भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा, जमीन खरेदीसाठी चक्क नॅशनलाईज बँकेचा वापर, आर्थिक व्यवहारातील भागीदारही SIT च्या रडारवर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget