एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे?; पुण्यातील कंपन्यांवरुन नितेश राणेंचा सवाल

पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजेचं पुण्याच्या आयटी पार्कमधून 37 कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्यावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे.

अहमदनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुणे चांगलंच चर्चेत आह. अल्पवयीन मुलाच्या पोर्शे कार अपघातामुळे पुणे केंद्रस्थानी असून आमदार रवींद्र धंगेकरांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरल्याचं पाहायला मिळालं. त्यातच, माझं पुणे शहर चांगलं आणि पब संस्कृतीतून मला बाहेर काढायचं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, पुण्यातील 37 कंपन्या पुणे शहरातून बाहेर गेल्याची माहितीही त्यांनी शेअर केली होती. त्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) याच मुद्द्यावरुन राज्यातील भाजपा-शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे लंडन दौऱ्यावर असल्याने, आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) त्यांच्या लंडन दौऱ्याचा उल्लेख करत पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकार काळातच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचं त्यांनी म्हटलं. 

पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजेचं पुण्याच्या आयटी पार्कमधून 37 कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्यावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे. पुण्यातील आयटी पार्कमधून कंपन्या बाहेर गेल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत, गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्यात अव्वल असल्याचे म्हटले. तर, आता आमदार नितेश राणे यांनी थेट ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. नितेश राणे सध्या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले आहेत. यावेळी, पत्रकारांशी बोलताना राणेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी, पुण्यातील कंपन्यांवरुन ठाकरेंना सवाल केला. तसेच, ठाकरेंच्या काळात, कोरोनामध्येच ह्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचं त्यांनी म्हटलं. 

ठाकरेंना लंडनमध्येच पॅकअप करा

पुण्यातील जेवढ्या कंपन्या बाहेर गेल्या, त्या कोरोना काळात गेल्या आहेत. उध्दव ठाकरेंच्या सरकारच्या काळातच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या. उध्दव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत असल्याचं राणेंनी म्हटलं. तसेच, ठाकरेंना लंडनहून परत येवू द्यायचे का? याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. लंडनमध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करणाऱ्यांना लंडनमध्येच पॅकअप करा, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, कंपन्या आत्ता गेल्या हे उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे, असा सवालही उपस्थित केलाय. दरम्यान, उध्दव ठाकरे खोटारडे आहेत, असेही राणेंनी म्हटले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

''घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून 37 आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक कंपन्या महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रीयपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे,'' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर, आता आमदार नितेश राणेंनी पलटवार केला आहे. 

वाहतूक कोंडीमुळे कंपन्या गेल्या

हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडीमुळे अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दीड तास लागतो. वाहतूक कोंडीत दररोज कर्मचाऱ्यांचा 1 तास वाया जातो. आयटी कंपनीकडून सेवा देताना कर्मचाऱ्याचे तासाचे सुमारे 25 डॉलर आकारले जातात. एक तास वाया गेल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 25 डॉलरचे दैनिक नुकसान होत आहे, असा दावा हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या योगेश जोशी यांनी केला आहे. आमच्या संघटनेच्या सदस्य असलेल्या 37 कंपन्या गेल्या दहा वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधून बाहेर गेल्या आहेत. या कंपन्या कोरोना आणि त्या आधीच्या काळात स्थलांतरित झाल्याचं त्यांनी सांगितलं. अलीकडच्या काही महिन्यात एकही कंपनी पुण्यातील आयटी हबममधून स्थलांतरित झाली नसल्याची माहिती जोशी यांनी दिली.सदस्य नसलेल्या इतर कंपन्याही या काळात बाहेर गेल्या असून, तीही संख्या मोठी आहे. त्यामुळे आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या तातडीने सोडविण्याची आवश्यकता असल्याचं जोशी यांनी म्हटलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget