एक्स्प्लोर

नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने शिवसेना नाराज

ज्या नाणार प्रकल्पावरुन लोकसभा निवडणुकीला युती झाली होती त्याच नाणारवरुन युती तुटतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : शिवसेनेने 'आरेला कारे'चा नारा दिल्यानंतर भाजपने आता 'नाणार येणार'ची पुनरुच्चार केला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेत नाराजीचं वातावरण तयार झालं आहे. एकदा नाणार जाणारची घोषणा केल्यानंतर परत मुख्यमंत्र्यांनी नाणारचा विषय काढून जनतेच्या मनात असंतोष निर्माण केल्याची भावना शिवसेनेकडून व्यक्त होत आहे. या विषयावर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील, बाकी कोणीही बोलणार नाही, असं ठरल्याचं कळतं. तसंच आज (18 सप्टेंबर) संध्याकाळी राजापूर परिसरात लोक मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. त्यामुळे ज्या नाणार प्रकल्पावरुन लोकसभा निवडणुकीला युती झाली होती त्याच नाणारवरुन युती तुटतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाणार प्रकल्प सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरु करण्याचे संकेत दिले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सकारात्मक घोषणा दिल्या. "आम्ही आधीपासून सांगत होतो नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिले. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे. या प्रकल्पामुळे कोकणातल्या एक लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे कोकणाचा कायापालट होणार आहे. ज्या प्रकारे याला विरोध झाला त्यामुळे आम्ही हा प्रकल्प थांबवला, मात्र आपला उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल. आज कुठला निर्णय जाहीर करत नसलो तरी यावर चर्चा केली जाईल," असं मुख्यमंत्री म्हणाले. नाणार प्रकल्प बंद 18 मे 2017 रोजी नाणार प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कारसिंगवेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कात्रादेवी, कारिवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ व गोठीवरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये, रामेश्वर येथील जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. 14 गावांतील सुमारे 15 हजार एकर जमिनी यासाठी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. ही अधिसूचना देखील रद्द करण्यात आली होती. प्रकल्पक्षेत्रातील 14 ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधी ठराव मंजूर केले होते. तसंच कोकणातील सर्व आमदार आणि खासदारांनी प्रकल्पाला विरोध केला होता. स्थानिक जनतेने भूसंपादनापूर्वी आवश्यक अशी जमीन मोजणी होऊ दिली नव्हती. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. संबंधित बातम्या

नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित

VIDEO | नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द | एबीपी माझा

नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता

नाणार रिफायनरी विरोधात कोकणवासीयांचा 'एल्गार' | स्पेशल रिपोर्ट | मुंबई

कणाहीन मुख्यमंत्र्यांना नाणार प्रकल्प लादू देणार नाही : उद्धव ठाकरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांचा मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून केलं तडीपार 
सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांचा मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून केलं तडीपार 
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप, कर्जदारांना दिलासा;  एका निर्णयानं मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक पडले
मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेऊ नका, कर्जदारांना धमकावल्यास कारवाई, बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांचा चाप
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर
दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर
Embed widget